महाराष्ट्र

Parinay Fuke : ऐतिहासिक निर्णयाने भ्रष्टाचाराला आळा, गरीब मुस्लिमांना न्याय

Waqf Board : आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले केंद्र सरकारचे कौतुक 

Author

वक्फ कायद्यात सुधारणा करणारे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले आहे. ज्यामुळे वक्फ बोर्डाच्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात येईल. भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी मोदी सरकारच्या या निर्णायक पावलाचे अभिनंदन केले.

देशाच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण घडला आहे. वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे वक्फ बोर्डामध्ये पारदर्शकता येणार आहे. गरिबांवर होणाऱ्या अन्यायाचा अंत होणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात देशावर लादलेल्या वक्फ बोर्डाच्या चुकीच्या कारभारामुळे अनेक मुस्लिम आणि गैर-मुस्लिम बांधव त्रस्त होते. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे आता या अन्यायाला पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले.

ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. वक्फ बोर्डाच्या चुकीच्या कारभारामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या गेल्या होत्या. बहुसंख्य समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढनिश्चयाने आणि एनडीए सरकारच्या नेतृत्वाखाली वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे खरोखरच ऐतिहासिक पाऊल आहे, असे डॉ. फुके म्हणाले.

Loksabha : वक्फ सुधारणा विधेयकाची लोकसभेत मंजुरी

वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण

काँग्रेसच्या सत्ताकाळात वक्फ बोर्डाचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढला होता. अनेक सरकारी, खासगी आणि धार्मिक जमिनी अनधिकृतपणे वक्फ बोर्डाने हस्तगत केल्या होत्या. यातून मोठा भ्रष्टाचार होत होता, ज्यामुळे गरीब मुस्लिम समाजावर अन्याय झाला. मात्र, या विधेयकामुळे आता प्रशासन अधिक सुयोग्य आणि पारदर्शक होईल. वक्फ बोर्डाची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस आळा घालण्यात येणार आहे, असेही डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

लोकसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या विधेयकामुळे वक्फ कायद्याच्या त्रुटी दूर होणार आहेत. डॉ. परिणय फुके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आणि एनडीए मधील सर्व घटक पक्षांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ मुस्लिम समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या न्यायप्रियतेसाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. गरीब मुस्लिम समाजाला याचा मोठा फायदा होणार असून, वक्फ बोर्डाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जो त्रास सहन करावा लागत होता, त्याचा शेवट झाला आहे, असे परिणय फुके यांनी म्हटले आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

केंद्र सरकारच्या या विधेयकामुळे अनेक शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे वक्फ बोर्डाच्या नावाखाली लाखो लोकांची फसवणूक झाली होती. मात्र, एनडीए सरकारने हा अन्याय दूर करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. डॉ. परिणय फुके यांच्यासह अनेक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशभरातून मोदी सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशाच्या प्रशासनिक व्यवस्थेत या विधेयकामुळे मोठा बदल होणार असून, भ्रष्टाचार, अन्याय आणि गैरव्यवहार यावर कठोर नियंत्रण मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय देशाच्या हितासाठी महत्त्वाचा ठरेल, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!