
गंगेमध्ये डुबकी मारल्यानं लोकांची गरीबी दूर होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी समाचार घेतला आहे.
गंगा नदीत स्नान केल्यानं गरीबी दूर होणार नाही. काँग्रेस अध्यख मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशमधील महू येथे बोलताना हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. खर्गे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपनं खर्गे यांच्या या विधानाला हिंदू विरोधी म्हटलं आहे. काँग्रेस आता मुस्लिम लीग बनल्याची टीकाही भाजकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनीही संताप व्यक्त केला आहे. डॉ. फुके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आणि ‘द लोकहित लाइव्ह’शी बोलताना खर्गे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
डॉ. फुके म्हणाले की, महाकुंभ मेळाव्याच्या निमित्तानं जगभरातील कोट्यवधी लोक भारतात देतात. अगदी विदेशी नागरिकही महाकुंभ मध्ये स्नानासाठी येतात. पाश्चात्य देशात तर आता सनातन धर्माची ध्वजा फडकत आहे. ही सगळी मंडळी मुर्ख आहे का? मल्लीकार्जुन खर्गे यांना कदाचित वेगळं ज्ञान असावं. महाकुंभचा पर्व देशातील आध्यात्मिक, सांस्कृतिक, एकात्मतेचे चित्र दर्शवितो. काँग्रेस आणि मल्लीकार्जुन खर्गे यांना नेमकं हेच नको आहे. काँग्रेसच्याच चुकीमुळं देशाचे तुकडे झाले. काँग्रेसनं आपल्या स्वार्थासाठी आधी भारताची फाळणी करून पाकिस्तान तयार केला. त्यानंतर बांगलादेश तयार केला. काश्मिरचा मुद्दा आतापर्यंत कायम ठेवला. यावरून त्यांना केवळ सत्ता हवी आहे. राष्ट्रहिताचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही.

निषेधार्ह वाक्य
मल्लीकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो. हिंदू धर्माच्या पवित्र सणांवर नेहमीच काँग्रेसकडून टीका केली जाते. हिंदू देवीदेवतांवर टीका केली जाते. खर्गे यांच्या वक्तव्यानं काँग्रेस पुन्हा एका हिंदू आणि सनातन धर्म विरोधी असल्याचं सिद्ध झालं आहे. महाकुंभचा पर्व अलीकडच्या काळातील नाही. हजारो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळं काँग्रेस आणि मल्लीकार्जुन खर्गे यांना भारतीय सभ्यता, संस्कृतीवर विश्वास नाही. हिंदू धर्मावर तर अजिबात विश्वास नाही, हेच सिद्ध होतं, असं डॉ. फुके म्हणाले. काँग्रेसनं नेहमीच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. हे काम त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे. यंदाही मल्लीकार्जुन खर्गे यांनी केलेलं विधान हिंदू धर्मियांना दुखावण्यासाठीच करण्यात आलं आहं, असं डॉ. फुके म्हणाले.
हिंदू धर्माच्या भावना दुखावणाच्या काँग्रेस आणि मल्लीकार्जुन खर्गे यांचा आपण निषेध व्यक्त करतो. गंगेत स्नान केल्यानं गरीबी दूर होत नाही असं ते म्हणतात. देशात काँग्रेसनं स्वातंत्र्यापासून 70 वर्ष राज्य केलं. त्यांनी गरीबी दूर केली नाही. उलट गरीबांचा मतांसाठी वापर करून घेतला. दलित, ओबीसी समाजाला सुविधांपासून वंचित ठेवलं. काश्मिरला भारतापासून वेगळं ठेवलं. काँग्रेसच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले देशात झालेत. भारत तेरे टुकडे होंगे असे नारे दिले गेले. हजारो पंडितांची कत्तल झाली. काश्मिरमध्ये सैन्य दलावर दगडं मारली गेली. ईशान्य भारत धुमसत राहिले. त्यामुळं काँग्रेसला गरीबी, राष्ट्रभक्ती, एकात्मता, समता यावर बोलण्याचा काहीही हक्क नाही, अशी टीकाही माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.