
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. तब्बल 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत हे तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त केले जाणार आहेत. विधान परिषदेतील भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या महत्त्वाच्या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या ठोस मागणीला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जलसंपत्ती व्यवस्थापनात या निर्णयामुळे मोठी सुधारणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहेत. त्यानंतर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तलावांचे गाळमुक्तीकरण त्वरित सुरू करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, या गाळमुक्ती मोहिमेसाठी सरकारसोबत टाटा ट्रस्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

धान उत्पादकांसाठी सुवर्णसंधी
भंडारा आणि गोंदिया हे महाराष्ट्रातील प्रमुख धान उत्पादक जिल्हे आहेत. मात्र, पाण्याची टंचाई आणि जलस्रोतांच्या असमर्पक व्यवस्थापनामुळे येथील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत होते. डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा विधान परिषदेत प्रभावीपणे मांडत सरकारला ठोस उपाययोजना करण्यास भाग पाडले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
तलाव गाळमुक्त झाल्यानंतर जलसाठ्याची क्षमता वाढणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासही मोठा हातभार लागणार आहे. डॉ. परिणय फुके यांच्या धडपडीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे.
सरकारचा हिताचा निर्णय
भाजप-महायुती सरकार हे खरोखरच शेतकऱ्यांचे सरकार आहे, याचा प्रत्यय या निर्णयातून आला आहे. घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम करण्यावर भर देण्याची भाजप सरकारची भूमिका यामुळे अधोरेखित झाली आहे. डॉ. परिणय फुके यांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे या प्रकल्पाला वेग मिळाला आहे आणि शेतकऱ्यांना आता त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
प्रकल्पासाठी सरकार आणि टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य राहणार आहे. आधुनिक यंत्रसामग्री आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
अर्थव्यवस्थेचा विकास
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेला या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे. डॉ. परिणय फुके यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. तलाव गाळमुक्त झाल्याने जलसाठा वाढेल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि पर्यावरणीय समतोल राखला जाईल.
भाजप सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण विदर्भातील जलसंधारणाच्या कामांना एक नवा वेग मिळेल. डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारामुळे जलव्यवस्थापन क्षेत्रात एक आदर्श निर्माण होणार आहे. हा उपक्रम भविष्यात इतर भागांसाठीही दिशादर्शक ठरेल.