महाराष्ट्र

कधी रस्त्यातच Bus बंद पडते तर कधी धावत्यावेळी छप्परच उडते 

भंगारगाड्या केवळ Vidarbha साठीच आहेत का ? 

Author

एसटीने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु गाड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे विदर्भातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

विदर्भात एसटी बससेवा दिवसेंदिवस दयनीय होत असून प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. महामंडळाकडून विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष आता स्पष्टपणे जाणवत आहे. राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा हा प्रदेश, मात्र सार्वजनिक वाहतुकीच्या मूलभूत सोयींसाठी संघर्ष करत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एका एसटी बसला नुकताच विचित्र अपघात झाला. बस प्रवासादरम्यान धावत्या बसचे अचानक छप्पर उडाले आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेने एसटी बसच्या दयनीय स्थितीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला.

येरे येरे पावसा एनएमसीला नको चुका मागल्या

वारंवार अपघात

सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवशाही बससेवा विदर्भात अपेक्षित दर्जा राखण्यात अपयशी ठरत आहे. या बसेस आधुनिक व आरामदायी असाव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात या गाड्या सतत बिघाड होत आहे. वेळेवर देखभाल केली जात नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवशाही बसेसच्या सतत बंद पडण्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे.

अनेक शिवशाही बसेस वारंवार अपघातग्रस्त होत आहेत. जे गंभीर चिंतेचा विषय आहे. अशा अपघातांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. या गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती पुरेशी केली जात नाही. त्यामुळे त्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा शिवशाही बसेस प्रवाशांसाठी सुरक्षित पर्याय राहणार नाहीत.

अकोला महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नवीन Tagline, खाऊ आम्ही, बील द्या तुम्ही

प्रशासनाचे दुर्लक्ष?

विदर्भातील बहुतांश एसटी बसेस जुन्या, जीर्ण झालेल्या आणि देखभालीअभावी धोकादायक झाल्या आहेत. अनेक बसेस रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. मुंबई-पुण्यासारख्या भागांमध्ये नव्या अत्याधुनिक बसेस चालवल्या जात असताना विदर्भात मात्र जुनाट, धोकादायक बसेस पाठवल्या जात आहेत. हे स्पष्ट दर्शवते की एसटी महामंडळ आणि प्रशासन विदर्भावर अन्याय करत आहे.

विदर्भातील प्रवाशांचे एकच मागणे आहे की, जुन्या व धोकादायक बसगाड्या हटवून, सुरक्षित आणि नव्या बसेस उपलब्ध करून द्या. सरकार आणि एसटी महामंडळाने त्वरित दखल घेऊन विदर्भातील प्रवाशांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. विदर्भ हा राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. तरीही त्याकडे सतत दुय्यम वागणूक का दिली जाते? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तर भंगार गाड्या केवळ विदर्भासाठीच बनल्या आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!