
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी बहिरम बाबा यात्रेत आयोजित शंकरपट रेसमध्ये भाग घेतला.
विदर्भातील बहिरम बाबा यात्रेत यावर्षी आयोजित शंकरपट रेसने उत्साहाची उंची गाठली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात 400 हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. या शर्यतीचे खास आकर्षण ठरले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू. त्यांनी त्यांच्या गोविंदा आणि शिवा या बैलजोडीसह शंकरपट रेसमध्ये 6.99 सेकंदात बाजी मारली. विशेष म्हणजे, त्यांच्या शर्यतीइतकाच त्यांचा भाषणही सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला. लाखो प्रेक्षकांसमोर बच्चू कडू यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत आपली ताकद दाखवली.
बच्चू कडू म्हणाले, ही 56 इंचाची छाती नाही, ही शेतकऱ्याच्या मुलाची छाती आहे. आम्ही चिता जशी धावते तशाच रफ्तारने काम करत आहोत. मला पाडण्याची कोणाचीच ताकद नाही. तुम्ही बेईमानी केली म्हणून मी हरतो, पण शेवटी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय. आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा शेतकऱ्यांसाठी वाहतोय.

पिकविम्यासाठी Devendra Fadnavis यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ‘मसिहा’
बैलजोड्यांचा जलवा
यंदाची बहिरम बाबा यात्रा विदर्भातील सर्वांत मोठी ठरली. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. बच्चू कडू यांच्या गोविंदा आणि शिवा या बैलजोडीने 6.99 सेकंदात धाव घेत रेस जिंकली, पण देवाभाई-महिप्या जोडीने 6.49 सेकंदात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. दुसऱ्या क्रमांकावर मिसल देवा यांची बैलजोडी 6,52 सेकंदाच्या वेळेसह आली. ही स्पर्धा शेतकरी आणि प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्साहवर्धक ठरली.
या शंकरपटामध्ये 400 ढोलवादकांनी बाजा वाजवत रंगत आणली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी लाखो प्रेक्षकांनी उत्साहाने गर्दी केली होती. विजेत्यांना व्हीलर आणि रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. विशेष म्हणजे, संपूर्ण शर्यतीत बैलगाड्यांचा वेग आणि शेतकऱ्यांचा आनंद याने माहोल भारावून गेला.
सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध कडक निर्णय: Ashish Jaiswal
तुम्ही मला थांबवू शकत नाही…
बच्चू कडू यांचा भाषणाचा दमही शंकरपटाच्या वेगाइतकाच प्रभावी ठरला. त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत विरोधकांवर कडवट टीका केली. तुम्ही मला थांबवू शकत नाही, तुमचं कारस्थान आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही अजून जोमाने लढणार, असे ते म्हणाले.
हा जंगी शंकरपट आणि बच्चू कडू यांचे भाषण यामुळे बहिरम यात्रेची चर्चा विदर्भभर झाली. शेतकऱ्यांच्या मुलाने आपल्या बैलगाडीच्या वेगाने आणि भाषणाच्या ताकदीने या यात्रेला एक वेगळी उंची दिली.