महाराष्ट्र

Prakash Ambedkar : काँग्रेसने दलितांचा लढा चोरून आपला केला

Congress : तीन पंतप्रधानांची नेतृत्वं असूनही मुद्दे का सोडवले नाही  

Author

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले मुद्दे चोरून त्यांना स्वतःचे म्हणून सादर केल्याचा आरोप केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं हे नवीन नाही, मात्र अलीकडील आरोपांची तीव्रता काही वेगळीच आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि दलित, आदिवासी, बहुजन समाजाचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद उडाला आहे. आंबेडकर यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसने देशातील बहुजन समाजाच्या मुद्द्यांवर जबरदस्तीने कब्जा केला असून त्याला स्वतःचे म्हणून सादर केलं आहे.

आंबेडकर यांचा आरोप आहे की, काँग्रेसने कितीही दलित, आदिवासी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवला असला तरी त्याला प्रत्यक्षात काहीही साध्य केले नाही. काँग्रेसने या समाजासाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे, पण त्यामागे काहीतरी ठोस कार्य करण्याऐवजी, केवळ शब्दांची उधळण केली आहे. काँग्रेसच्या घोषणांपेक्षा त्या समाजासाठी उपयुक्त ठोस कार्य गहाळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प

विचारांचे अपहरण प्रकरण

काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेला हा हल्ला, केवळ एका राजकीय विरोधाच्या चौकटीत थांबत नाही, तर त्यात आंबेडकरी विचारधारेचा मुद्दाही समाविष्ट आहे. आंबेडकर यांचे म्हणणे आहे की काँग्रेसने दलित-आदिवासी समाजासाठी जे मुद्दे उचलले, ते आंबेडकरी विचारधारा व त्यानंतरच्या अनेक वर्षांच्या लढ्याचे परिणाम होते. तुम्ही कुठेही बघा, काँग्रेसच्या मागण्या तेच आहेत, जे मागण्या आम्ही 1980 पासून मांडत आलो, असे आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप अधिक तीव्र करत काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने आमचे मुद्दे चोरून स्वतःचे म्हणून विकले आहेत, असे आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या मते, काँग्रेसने या समाजाच्या हक्कांसाठी लढण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात त्याच मागण्यांना पूरक ठोस कार्य केले नाही. आंबेडकर यांचे म्हणणे आहे की काँग्रेसने कधीही दलित, आदिवासी आणि बहुजन समाजाच्या लढ्याच्या मार्गावर नेत्यांचे नेतृत्व दिले नाही.

Nana Patole : महाराष्ट्राने सुरुवात केली, देशाने पाठिंबा दिला  

सत्ताधाऱ्यांवर तिखट टीका

बहुजन समाजाचे मुद्दे थोडक्यात मांडून त्यांना आपल्या फायद्याचा विषय बनवला. काँग्रेस तीन पंतप्रधानांच्या नेतृत्वात सत्तेवर होती. मग 1990 पासून 35 वर्षे सत्तेत राहूनही त्यांना हे मुद्दे का न पूर्ण करता आले? असा सवाल आंबेडकर यांनी विचारला. आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केल्यानंतर त्यांचे निरीक्षण राजकारणातील इतर पक्षांवरही लागू होऊ शकते. काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे ते म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!