महाराष्ट्र

खोटी माहिती दिल्याचा Prakash Ambedkar यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

सभागृहाची Devendra Fadnavis यांनी केली सभागृहाच दिशाभूल 

Author

बीड आणि परभणी जिल्ह्यातील घटनांमुळे सरकारला आरोपांच्या चौकटीत उभे करण्यात येत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना निशाणा केले आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती प्रदान केली आणि सभागृहाची दिशाभूल केली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. एक्स हॅण्डलवर प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट केली आहे.

परभणी येथे 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली होती. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान शहरात मोठी दंगल घडली. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. या ऑपरेशन दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली. या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की, सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाला आहे. त्याच्या शरीरावरील जखमा देखील जुन्याच असल्याचे म्हटले होते. शवविच्छेदन अहवालातून मात्र मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहे.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

पोलिसांवर गुन्हा दाखल करावा 

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली. घाटी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ सुर्यवंशीच्या मणक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजून आले. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमनाथला मारहाण केली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात जाहीरपणे खोटे बोलत असतील तर राज्याचे काय? असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

सोमनाथचा श्वसनाच्या आजारानेच मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. “माझ्याकडे मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरची कॉपी आहे. मॅजिस्ट्रेटने त्यांना दोनदा विचारलं होतं की, पोलिसांनी मारहाण केली का? त्यावेळी सोमनाथने नाही असं म्हटलं होतं. कोठडीत असतानाचे व्हिडिओ सुद्धा आहेत. त्यात सोमनाथला मारहाण झालेली दिसत नाही. त्याच्या शरीरावरील जखमा जुन्याच आहेत. शवविच्छेदन अहवालात श्वसनविकाराने सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नमूद आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

परभणीचा संपूर्ण घटनाक्रम

10 डिसेंबर 2024 रोजी संविधान प्रतिकृतीची एका माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर 11 डिसेंबरला घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर परभणीत दंगल उफाळून आली. 12 डिसेंबरला दंगलीच्या संशयावरून एलएलबीचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला कोठडीत बेदम मारहाण केली त्यानंतर कारागृहात डांबल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबीयांनी केला होता. 13 डिसेंबरला पोलिसांनी सोमनाथवर एकूण 16 गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले होते. 14 डिसेंबरला रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच परभणी जिल्हा कारागृहात करण्यात आली. 15 डिसेंबरला कारागृहातूनच सोमनाथला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि मृत घोषित केले. 16 डिसेंबरला घाटीच्या डॉक्टरांनी शरीरावरील जखमा अन् मानसिक धक्क्यातून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!