
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. यानंतर भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केल्या गेले. मात्र या विजयोत्सवावर विरोधकांनी टीका केली आहे.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत दाखवलेल्या पराक्रमामुळे देशभरात प्रचंड देशभक्तीची भावना जागली आहे. याच भावना साक्षीदार ठरवण्यासाठी देशात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यात हजारो देशवासी सहभागी झाले. सत्ताधारी भाजपने या विजयोत्सवाचा ठसा ठेवण्यासाठी संपूर्ण देशात तिरंगा यात्रांचे आयोजन केले. ज्यामुळे लोकांच्या मनात देशभक्तीची जोमदार लाट उमटली आहे.
परंतु या विजयोत्सवाला सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारेही आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रसंगी केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारला आहे की, पहलगाम हल्ल्याला जबाबदार अतिरेकी अजून कुठे आहेत? गत २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रासह अनेक नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाक अधिकृत अतिरेक्यांच्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर राबविले. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची वातावरण निर्माण झाले.

संयमाची गरज
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या विजय साजऱ्यांवर टीका करत म्हटले आहे की, मोदी साहेब, पहलगाम हल्ल्याच्या अतिरेक्यांचा शोध अजून लागलेला नाही, पण तुम्ही विजयाचा जल्लोष का साजरा करत आहात? त्यांच्या मते, हल्ल्यात ठार झालेल्या पीडितांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळालेला नाही. या वेळी अशा जल्लोषांचा अर्थ काय आहे? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारणं आवश्यक आहे, असं आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही केंद्राला पत्र लिहून या जल्लोषावर संशय व्यक्त केला आहे.
अमित ठाकरेंच्या मते, सध्या काही ठिकाणी विजय साजरा करणे चुकीचे आहे. कारण युद्धाचा निकाल अजूनही स्पष्ट झालेला नाही. ते म्हणतात, ही वेळ विजय साजऱ्याची नाही, तर युद्धविराम राखण्याची आहे. अमित ठाकरेंनी सरकारला विनंती केली आहे की, सैनिकांच्या शौर्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर या वेळी संयम बाळगावा. ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा आनंद साजरा करायचा आहे, पण शहीदांच्या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत संयम आणि संवेदनशीलतेने वागण्याची गरज आहे. देशाच्या ह्या संवेदनशील काळात अशी चर्चा आणि विचार मंथन अधिक आवश्यक ठरत आहे.