महाराष्ट्र

Prakash Ambedkar : रक्ताने माखलेल्या हातांची इफ्तार भेट

Narendra Modi : प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला

Author

भाजपने रमजानच्या पार्श्वभूमीवर सौगात-ए-मोदी मोहीम सुरू केली, मुस्लिमांना ईदसाठी मदत किट देण्याचा संकल्प केला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी या मोहिमेवर टीका करत ती राजकीय स्वार्थासाठीची आणि रक्ताने माखलेली असल्याचे म्हटले आहे.

नव्या राजकीय रणनितीच्या छायेत भाजपने सौगात-ए-मोदी मोहीम सुरू केली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर 32 लाख वंचित मुस्लिम कुटुंबांना ईदच्या भेटवस्तूंचे किट वितरित करण्याचा संकल्प केला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेतृत्वाखाली देशभरातील मशिदींमध्ये हे किट वितरित केली जात आहेत. यात खाद्यपदार्थ, कपडे आणि सुकामेव्याचा समावेश आहे. या मोहिमेमागील राजकीय हेतू आणि सत्तेचा कावा ओळखत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट शब्दांत मोदी सरकारवर आसूड ओढले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी या मोहिमेवर अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत ती रक्ताने माखलेली असल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या दंगलींपासून ते मॉब लिंचिंगपर्यंत हजारो निरपराध मुस्लिमांच्या हत्यांनी माखलेल्या हातांनी आता रमजानच्या निमित्ताने किट वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात अल्पसंख्याकांवर वाढते हल्ले, वक्फ बोर्डाच्या जमिनींवर सुरू असलेला सरकारी हस्तक्षेप आणि बुलडोझर राजकारणाच्या छायेत मुस्लिमांच्या अस्मितेचा विध्वंस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मोहिमेचा हेतू अधिकच संशयास्पद ठरत आहे. आंबेडकर यांनी या मोहिमेचा अर्थ लावला आहे, अल्पसंख्याकांना दडपून, त्यांच्यावर अन्याय करून, त्यांच्या हक्कांवर गदा आणून त्यानंतर त्यांना भेटी देण्याचे ढोंग करण्याचा हा प्रकार आहे.

Nitin Gadkari : विकास पुरुषाकडून राज्याच्या महामार्ग जाळ्यात मोठी भर

भूलवणारी राजकारणाची खेळी

गुजरातमध्ये झालेल्या 2022 मधील दंगलीत बलात्कार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या बिल्किस बानोच्या वेदनांपासून ते तबरेज अन्सारी, जुनैद खान, पेहलू खान यांसारख्या असंख्य मुस्लिम तरुणांच्या निर्घृण हत्यांपर्यंत हा रक्ताचा इतिहास भाजपच्या हाताशी चिकटला आहे. या हत्या आणि अन्याय विसरून रमजानच्या निमित्ताने मिळालेल्या थोड्याशा मदतीमुळे मुस्लिम समाज गाफील राहील का? सत्ताधारी पक्षाच्या यंत्रणांनी अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजांवरही वार केले आहेत. आता मात्र त्याच गरजांवर उपचार करण्याचे ढोंग केले जात आहे. आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ही मदत नव्हे, तर शांततेच्या नावाखाली गोडगोड शब्दांनी भुलवण्याचा प्रयत्न आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक मोहिमांची पार्श्वभूमी पाहता, ही केवळ निवडणुकीपूर्वीची राजकीय खेळी असल्याचे स्पष्ट दिसते. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर केलेल्या हस्तक्षेपातून मुस्लिम समाजावर आर्थिक गंडांतर आणणाऱ्या सरकारला अल्पसंख्याक कल्याणाचा कळवळा कधीपासून आला? सामान्य मुस्लिमांच्या प्रश्नांवर मौन बाळगणारे काही तथाकथित नेते आणि मौलवी याही मोहिमेला पाठिंबा देत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. सीएए-एनआरसीच्या विरोधात लढताना सोबत उभे राहिलेले मुस्लिम कार्यकर्ते तुरुंगात आहेत, त्यांना बाजूला ठेवून आता सत्ताधाऱ्यांच्या साखरपुड्याला स्वीकारायचे का?असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.

Ramtek : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अवैध मुरुम उत्खननाला ऊत

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

संपूर्ण परिस्थितीवर आंबेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. मुस्लिम समाजाने मित्र आणि शत्रू यामधील फरक ओळखला पाहिजे. सरकारची सौगात स्वीकारताना त्यांनी आपला इतिहास आणि आपल्या हक्कांची आठवण ठेवली पाहिजे. भाजपची सौगात-ए-मोदी मोहीम निवडणुकीच्या राजकारणाचा एक भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. एक हाताने मार, दुसऱ्या हाताने प्रेम दाखव, या नीतीने सरकार अल्पसंख्याकांना दिशाभूल करू पाहत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचे भाष्य हे एक कठोर वास्तव अधोरेखित करते की हा सौदा स्वीकारण्याआधी इतिहास आठवावा.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!