देश

Narendra Modi : आता चर्चा केवळ PoK वरच

Operation Sindoor : ते गोळी मारतील तर आम्ही गोळा मारू 

Author

भारताच्या संयमाचा अंत झाला आहे. आता प्रतिउत्तर फक्त शब्दांत नाही, तर रणांगणात दिसेल. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, PoK वगळता कोणतीही चर्चा आता भारताला मान्य नाही.

ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण झालेलं नाही. भारताची भूमिका आता केवळ रक्षणापुरती नाही, तर प्रतिहल्ला आणि निर्णायक विजयावर केंद्रित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्याशी बोलताना पाकिस्तानला दिलेला इशारा स्पष्ट आणि निर्भीड आहे. “ते गोळी झाडतील, तर आपण गोळा सोडून त्यांचं अस्तित्वच हादरवू.”

भारताची ही आग्रही आणि आक्रमक भूमिका आता संपूर्ण जगाच्या लक्षात आली आहे. युद्धबंदीची घोषणा होऊनही पाकिस्तानने शांतता न पाळता सीमांवर 26 ठिकाणी गोळीबार करून आपला कट रचला. पण भारतानेही वेळ न दवडता, निर्धाराने प्रत्युत्तर दिलं आणि दिलं ते थेट त्यांच्या तळांवर हल्ला करून.

अंतिम मुद्दा

अमेरिकेतील एका वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना सांगितलं की कश्मीरबाबत भारताची भूमिका आता पूर्णतः स्पष्ट आहे. आता चर्चा फक्त पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर (PoK) या एकाच मुद्द्यावर होईल. त्याव्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्यावर भारत न बोलणार, ना माघार घेणार. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितलं, जर पाकिस्तान आमच्याकडे दहशतवाद्यांना सुपूर्द करण्याच्या बाबतीत बोलत असेल, तर एकवेळ चर्चा शक्य आहे. पण त्याव्यतिरिक्त आम्हाला ना मध्यस्थी हवी, ना कुणा तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप.

Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले

प्राप्त माहितीनुसार सध्या भारत-पाकिस्तान संवाद फक्त DGMO (Director General of Military Operations) स्तरावरच सुरु आहेत. कोणतेही राजनैतिक संपर्क किंवा परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान चर्चा झालेली नाही. NSA किंवा कोणत्याही उच्चस्तरीय राजनैतिक बैठकांचा मागमूसही नाही. हे स्पष्ट दर्शवतं की भारत आता फक्त सामरिक पातळीवर व्यवहार करत आहे, थेट, ठोस आणि तडाखेबाज.

आरपारची भूमिका

11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरक्षा विषयावर एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, NSA अजित डोवाल, CDS (Chief of Defence Staff) आणि तीन्ही सैन्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. या बैठकीचा मुख्य उद्देश होता, भारताची रणनीती आता केवळ बचावाची नाही, तर निर्णायक विजयाची.

पाकिस्तानसारख्या दहशतवादी पोसणाऱ्या देशाला आता भारताकडून क्षमा नाही. प्रत्येक गोळीबाराचं उत्तर गोळ्यांनी नाही, तर तात्काळ आणि धडाकेबाज कारवाईने दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर ही केवळ सुरुवात आहे. भारत आता पाकिस्तानच्या मनात कायमचा धसका बसेल असं पुढचं पाऊल उचलायला सज्ज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!