महाराष्ट्र

Anil Deshmukh : सत्तेचे नाटक थांबवा, देशाचा विश्वास बाळगा

Maharashtra Election : राहुल गांधींच्या आरोपाने राजकारण निघाले ढवळून

Post View : 59

Author

राहुल गांधींनी महाराष्ट्र मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बनावट नावे आढळल्याचा आणि निवडणूक आयोग व भाजपवर मतदार यादीत फसवणुकीचे आरोप केले आहेत. ज्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पताका अनेक राज्यांत उंचावलेली दिसली होती. मतदारांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.  लोकांच्या मनात त्यांचा पुनरागमनाचा विश्वास वाढला होता. मात्र, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर सत्तेच्या भूमिकेचे स्वरूप अचानकच बदलले. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकून पुनः एकदा राज्यात सत्ता मिळवली. ज्यामुळे काँग्रेसच्या चेहऱ्यावरचा विजयाचा आनंद विरळा झाला. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण खूपच गोंधळलेले आहे. काँग्रेसकडून मतचोरीचे आरोप थेट येऊ लागले, जे लोकशाहीच्या मूल्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. 7 ऑगस्ट रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट गंभीर आरोप करत राजकारणात तहकूब उडाली.

राहुल गांधी यांच्या मते, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मतदार यादीत लाखो बनावट नावे आहेत. यामुळे निवडणुकीचा निकाल चुकीच्या दिशेने गेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर आशंका व्यक्त केल्या. मतदार यादीतील गडबडी, एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असणे, फोटोंचा अभाव आणि बनावट पत्त्यांची भरमार यामुळे मतमोह या प्रकरणी संशयाची शंका निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांनी आणखी एक मोठे रहस्य उघड केले की, मतदान संपल्यानंतर संध्याकाळी अचानक मतदानाच्या संख्येत झालेली विचित्र वाढ निवडणूक आयोगाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. काँग्रेसकडून आयोगाला अनेक प्रश्न विचारले गेले, मात्र अद्याप त्याकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर मिळालेले नाही.

Indian Politics : सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींना दिला विनाशाचा इशारा

लोकशाहीसाठी जनजागृती आवश्यक

राजकीय वादळाच्या मध्यभागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले, निवडणूक आयोग जर सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून काम करत असेल तर या देशातील लोकशाही कशी टिकेल? त्यांच्या या शब्दांनी या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट केली आहे. अनिल  देशमुखांनी लोकांनी या विषयावर जागरूक होणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. ही पत्रकार परिषद आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कारण लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे काम करावे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वादळी वातावरणात जनतेच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीतील विसंगतींचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांना सहा महिने मेहनत घ्यावी लागली. त्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक डेटा देण्यास नकार दिला. या गोष्टीमुळे निवडणूक प्रणालीतील पारदर्शकतेवर शंका वाढल्या आहेत. त्यांनी याशिवाय मतदार यादीत वडिलांच्या नावांसमोर अनोख्या चिन्हांची भरमार असल्याचे सांगितले, जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. मतांची चोरी समजून घेण्यासाठी आम्हाला सहा महिने लागले. आता जे काही मिळालंय, ते धक्कादायक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोगावर उठलेले हे आरोप आणि त्याला प्रतिसाद देण्याची मागणी या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाची भूमिका आणि स्वायत्तता यावर खोलवर चर्चा सुरू झाली आहे.

Buldhana Police : खाकी वर्दीचे रक्षक बनले भक्षक

देशाच्या लोकशाही प्रक्रियेला टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने पारदर्शक आणि निष्पक्ष कामगिरी करणे अत्यंत गरजेचे आहे. राजकारणातील या धक्कादायक खुलाश्यांनी आगामी महापालिका निवडणुकींवर आणि मतदारांच्या मनावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे राजकीय पक्षांत स्पर्धा नव्या वळणावर पोहोचली असून, जनतेत जागरूकता वाढवण्याचे काम सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक ठरले आहे.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!