महाराष्ट्र

Nitin Gadkari : राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही

Nagpur : गडकरींची पत्रकार परिषद ठरली विकासाचा रोड शो

Author

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केल्याने राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसनेही या पार्श्वभूमीवर आपली रणनिती आखत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. या टीकेचा केंद्रबिंदू ठरले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी. त्यांनी पुन्हा एकदा 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. राहुल गांधींनी लिहिलेल्या विशेष लेखात सरकारवर तुफान आरोपांची सरबत्ती केली आहे. हा निव्वळ निवडणूक अनियमिततेचा प्रश्न नसून, लोकशाही संस्थांवर कब्जा करून लोकशाहीची गळचेपी करण्यात आली असल्याचा गंभीर ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.

गांधींच्या या वक्तव्याने दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे. राहुल गांधींच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही प्रत्युत्तर देत टोलेबाजी केली. राहुल गांधींना काँग्रेसमध्येच कोणी गंभीरतेने घेत नाही, मग तुम्ही का घेताय? असा थेट सवाल त्यांनी केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याच परिषदेत गडकरींनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत त्यावरही टीका केली. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गैरसोयींबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. मात्र, पंतप्रधानांना देशभरातून हजारो लोक पत्रं लिहित असतात, असे सांगत गडकरींनी या मुद्द्याचं महत्त्व कमी केलं.

Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर

विकासकामांचा आढावा

राजकारणाच्या गदारोळातही गडकरींनी विकासकामांचा आढावा घेण्याचे विसरले नाही. मागील 11 वर्षांत देशात 10 ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमाने उतरू शकतील, असे 28 महामार्गही बांधले गेले आहेत. आगामी योजनांमध्ये रस्त्यांवर फाटक बसवण्याची योजना आहे. ज्या फाटकांमुळे विमाने सहज उडू आणि उतरू शकतील. धार्मिक स्थळांशी जोडलेल्या रस्त्यांनी भारतात धार्मिक पर्यटनाला गती दिली आहे. अयोध्या, काशी, उज्जैनसारख्या धार्मिक केंद्रांशी जोडले गेलेले रस्ते आता हजारो भक्तांच्या प्रवासाला सुलभ करत आहे.

गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 180 कोटी धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून होतो. काशीच्या विकासानंतर तिथल्या पर्यटकांची संख्या 8 पटीनं वाढली असून, सुमारे 70 लाखांवरून 6 कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली असून, 50 लाखांहून अधिक लोकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. गडकरींनी जनहिताच्या योजनांचाही उल्लेख करत सरकारच्या कामांची माहिती दिली. मोदी सरकारच्या काळात 55 कोटी जनधन खाती उघडण्यात आली, तर थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे नागरिकांच्या खात्यात 42 लाख कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्याचबरोबर मेगा फूड पार्कची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.

Maharashtra : मुख्यमंत्रीच बनावट निघाले अन् नोकरीही हवा झाली  

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या सावलीतही विकासाचं चित्र स्पष्ट करणारी ही पत्रकार परिषद भाजपाच्या आगामी निवडणूक तयारीचा एक भाग मानली जात आहे. मात्र, काँग्रेसचे हल्ले आणि गडकरींची उत्तरं यामुळे राजकारणात चुरस निश्चित वाढली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!