महाराष्ट्र

मतं कुठेतरी गायब झाली; Raj Thackeray यांचा प्रश्न

अद्यापही Assembly Election बाबत संभ्रम कायम

Post View : 19

Author

राज ठाकरे यांनी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर सखोल विश्लेषण करत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांवर गंभीर आरोप केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसंबंधी विश्लेषण सादर केले. अनेक राजकीय मुद्द्यांवर शंका उपस्थित केली. ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त करत विचारले की, बाळासाहेब थोरात, जे सात वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येत होते. ते एकाच वेळी केवळ 10 हजार मतांनी कसे पराभूत होतात? तसेच अजित पवारांचे 42 आमदार निवडून कसे आले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे यांचे भाषण सत्तेतील अनियमिततेला अधोरेखित करणारे होते. त्यांनी जोरदारपणे म्हटले की, लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले. यामुळे त्यांचा राज्यातील प्रभाव समजला जात होता. परंतु राज्य विधानसभेत त्यांचे फक्त 15 आमदार निवडून येणे, हे चांगलेच गोंधळ निर्माण करणारे आहे. शरद पवार यांचे 8 खासदार आणि 10 आमदार निवडून येणे देखील संदेहास्पद असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

Mahayuti : भाजप स्वबळाचे विमान हवेतून जमिनीवर?

ईव्हीएमवरील शंका

राज ठाकरे यांनी यावेळी EVM वर देखील प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, लोकांनी आपल्याला मतदान दिलं, पण ते मतं कुठेतरी गायब झाली. यामुळे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ईव्हीएम च्या वापरावर संशय व्यक्त केला. त्यांना असे वाटत होते की लोकांनी त्यांच्या पसंतीचे उमेदवार निवडून दिले. तरी मतदानाच्या नंतर ते मतं एका अनोळखी मार्गाने गायब झाली असावीत. ठाकरे यांच्या या वक्तव्याने राजकारणात एक नवीन वाद उचलला आहे.

राज ठाकरे यांची भाषणे केवळ एकाच पक्षावर लक्ष केंद्रित करत नाहीत. तर त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या विजयाबद्दलही शंका उपस्थित केली आहे. ठाकरे यांचा विश्वास आहे की युतीला मिळालेल्या विजयाची गणिते अनेक जणांना समजू शकत नाहीत. विशेषतः अजित पवारांनी 42 जागा कशा जिंकल्या हे एक गूढ आहे. ठाकरे यांनी असेही म्हटले की, या निवडणुकीत बहुतांश राजकारणी लोक शॉक्ड आहेत. पवारांची ताकद जरी जाहीर असली तरी, त्यांचा पक्ष किती मोठा आहे. राज ठाकरे यांचे आरोप एका राजकीय प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत. त्यांच्या या चर्चेने राज्यातील सत्तासंस्थेच्या विश्वसनीयतेवर शंकेची भावना निर्माण केली. पुढील काळात या आरोपांचा परिणाम कसा होईल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!