महाराष्ट्र

Shiv Sena : राज ठाकरेंचा गुलदस्ता ‘मातोश्री’वर की ‘डीसीएम’ बंगल्यावर?

Raj Thackeray : शिवसेनेच्या स्नेहभोजनामध्ये गोडवा की मिरचीचा तडका

Author

राज ठाकरे कोणासोबत युती करणार यावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि भाजप तिघेही मनसेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक चक्रव्यूह, जिथे प्रत्येक पाऊल नवं राजकीय वादळ घेऊन येतं. सत्तेच्या सिंहासनासाठी पक्षांतर्गत कुरघोडी, युतींची तारांबळ आणि नेत्यांचे डावपेच यांनी महाराष्ट्राचे राजकीय रंगमंच नेहमीच गाजत असते. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने सत्ता मिळवली खरी, पण आतल्या गोटात भाजप आणि शिंदे गटामधील धुसफूस लपून राहिलेली नाही. सुरक्षेच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंच्या दिशेने भाजपकडून आलेली थंडी आणि काही योजना थांबवण्याचे निर्णय यामुळे हे अंतर अधिकच स्पष्ट झाले. पण आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या पुढच्या खेळीकडे.

राजकारणात कोण, कधी, कुणाला मिठी मारेल सांगता येत नाही. त्याचंच जिवंत उदाहरण सध्या राज ठाकरे बनलेत. ठाकरे बंधू एकत्र येणार की शिंदे गटाशी हातमिळवणी करणार? की भाजपशी युती करणार हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. गेल्या काही आठवड्यांपासून  मनसे-उद्धव ठाकरे युतीचा फुगा जोरात फुगतो आहे. बॅनरबाजी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, सामाजिक माध्यमांवरील पोस्ट यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, एकीकडे शिंदे गटही हातावर हात धरून बसलेला नाही. मंत्री उदय सामंत यांच्याकडून राज ठाकरे यांच्याशी युतीसाठी खलबते सुरू असल्याचे वृत्त आहे.

Buldhana : शेतकऱ्यांनी महावितरणला दिला करंट

टाळी कुणाला मिळणार

अजून एक ‘सुप्रसिद्ध पण गुप्त’ घडामोड म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेली ‘गोपनीय भेट’. या बातमीने ठाकरे-राज युतीच्या चर्चा थंडावल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पुढचा डाव कोणाकडे झुकतोय, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतोय. कारण राज ठाकरे हे सध्या दोन्ही गटांमध्ये ‘राजकीय झुला’ खेळताना दिसत आहेत. 19 जून रोजी शिवसेना आपला वर्धापन दिन साजरा करत असताना, या सोहळ्याच्या निमित्ताने कोणत्या नव्या राजकीय समीकरणांची आखणी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय खलबतं अधिकच रंगताना दिसत आहे. शिंदे गटाकडून राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या बॅनरबाजीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पण खरंच मनसे कोणाला ‘टाळी’ देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची पुढची दिशा ठरवणार आहे पालिका निवडणुकीचं भवितव्य. सध्या मनसेसमोर दोन पर्याय आहेत. एकतर शिंदे गटाशी हातमिळवणी करावी, किंवा उद्धव ठाकरेसोबत नव्याने नाते जुळवावे. मात्र तिसरा आणि धाडसी पर्याय म्हणजे ‘एकला चलो रे’ म्हणजेच स्वतंत्र निवडणुकीत उतरणे.

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एव्हिएशनचा झेंडा फडकणार

नव्या समीकरणांची चाहूल

राज ठाकरे जर शिंदे गटाशी हातमिळवणी करतील, तर महायुतीची ताकद वाढेल. पण त्याचवेळी भाजपच्या अंतर्गत गटबाजीला खतपाणी मिळेल, अशी चर्चा आहे.  दुसरीकडे, जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे गेले, तर ठाकरे बंधूंची एकत्रित शक्ती महायुतीला आव्हान ठरू शकते. पण महाविकास आघाडीच्या अंतर्गत काही नेत्यांना ही युती रुचणारी नाही. तर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहे. ठाकरे बंधूंची युती ही भावनात्मकदृष्ट्या कार्यकर्त्यांना भुरळ घालणारी असली, तरी राजकीय मैदानात ती कितपत यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता आहे. महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वळणावर आहे.

ठाकरे बंधूंची युती, शिंदे गटाशी हातमिळवणी, की स्वतंत्र मार्गाची निवड? मनसे कोणाच्या खांद्याला खांदा लावणार, याचा निर्णय पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नवं समीकरण रचेल. राज ठाकरेंचा हा डाव महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Harshwardhan Sapkal : मराठीच्या पाठीवर हिंदीचा कट्यार 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!