महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या

Maharashtra : ठाकरे बंधूंच्या युतीनं बदलणार महाविकास आघाडीचे समीकरण

Author

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ, दोन वेगळ्या राजकीय वाटा आणि आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता. या दोन नेत्यांनी अलीकडे एकमेकांबाबत दिलेली विधानं पाहता, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला आहे. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून सुरू झालेलं बोलणं आता एका मोठ्या युतीच्या शक्यतेपर्यंत येऊन पोहोचलं आहे. आजवर या युतीबाबत काही न सांगणारी काँग्रेस, अखेर बोलली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करत स्पष्ट सांगितलं की, राज-उद्धव एकत्र येत असतील, तर आनंदच आहे.

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचे संकेत दिले. मग काय, उद्धव ठाकरेही शांत बसले नाहीत. त्यांनीही प्रतिटाळी दिली. यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येच नाही, तर कार्यकर्त्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. हे सर्व पाहता, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे. राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीचं काय होणार. वडेट्टीवार यांवर म्हणाले की आम्ही त्यात पडणार नाही. त्या दोघांना काय ते आधी ठरवू द्या. त्यांनी स्पष्ट केलं की काँग्रेसची भूमिका या युतीबाबत सकारात्मक आहे. महाविकास आघाडी ही काही 20-25 वर्षांची गोष्ट नाही. राजकीय गरज म्हणून ती तयार झाली होती, असंही ते म्हणाले.

Parinay Fuke : आमदाराच्या संघर्षामुळे ‘मत्स्यक्रांती’ची सुरुवात 

राजकीय इच्छाशक्तीची परीक्षा

वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर त्यात अडचण नाही. काँग्रेस त्यांचं स्वागतच करेल. पण युतीचं भविष्य काय, महाविकास आघाडीचं काय? याबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. ते पुढे जाऊन ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं क्षुल्लक आहेत. असे राज ठाकरेंनी सांगितले होते. ते पुढे म्हणाले, एकत्र येणं कठीण नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, माझ्या बाजूनं भांडण नव्हतं. मीही महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व काही विसरायला तयार आहे. पण एक अट आहे.

राज ठाकरेंनी ठरवावं की त्यांना भाजपसोबत जायचं आहे की आमच्यासोबत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा संवाद, त्यांच्या पक्षांमधील संभाव्य युती, आणि काँग्रेसची स्वागतार्ह भूमिका यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्याने पेटलं आहे. एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेत्यांचं नाही, तर दोन विचारसरणी, दोन राजकीय दिशा आणि लाखो समर्थकांची अपेक्षा यांचा संगम आहे. पण युती होईल का? आणि झालीच, तर ती महाविकास आघाडीला मजबूत करेल की नवा पर्याय निर्माण करेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सध्या तरी राज्याचं राजकारण राज-उद्धव रिटर्न्सच्या प्रतीक्षेत आहे.

Bhandara : चार दशकांचा संघर्ष संपला; गोसेखुर्दला मिळाली सुधारित मान्यता

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!