महाराष्ट्र

Nagpur : धोक्याच्या छायेत नागपूरचा औद्योगिक पट्टा

Vidarbha : मृत्यूच्या मालिकेनंतरही सुरक्षेची साधने अनुत्तरित

Author

नागपूर जिल्ह्यात स्फोटक कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे गेल्या दोन वर्षांत 31 कामगारांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन आणि कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचे प्राण धोक्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र सध्या बारुदाच्या धोक्याखाली आहे. गेल्या दोन वर्षांत स्फोटक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या भीषण स्फोटांनी तब्बल 31 कामगारांचे प्राण गेले असून 26 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्येक घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरतो, मात्र प्रशासन मात्र दरवेळी केवळ पंचनाम्यापुरते कार्य करत असल्याचा आरोप होत आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या पन्नासपेक्षा अधिक स्फोटक निर्मिती कंपन्या आहेत, पण त्यांच्यावर नियंत्रण आणि सुरक्षा उपाय योजनांची स्थिती अतिशय गंभीर आहे. हिंगणा, एमआयडीसी, उमरेड, धामना आणि कोतवालबड्डी परिसरात झालेल्या या स्फोटांनी औद्योगिक सुरक्षेचा बुरखा फाडला आहे. स्फोटानंतर धूर, रक्त, आक्रोश आणि पांढऱ्या कापडात लपेटलेले निष्प्राण शरीरं हे चित्र सातत्याने उभं राहत आहे.

Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार

स्फोटांचा सलग भडका

फेब्रुवारी 2025 मध्ये कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट झाला. यात दोन कामगार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले. एप्रिलमध्ये उमरेडमधील एमएमपी कंपनीत पुन्हा स्फोट झाला आणि 5 कामगार मृत्युमुखी पडले. जखमींमधील काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत जून 2024मध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये बाजारगावातील सोलार एक्सप्लोसिव्हमध्ये पुन्हा 9 कामगारांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा मोठा समावेश होता.

इकोनॉमिक्स एक्सप्लोसिव्हमध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा स्फोट झाला. या घटनेत 2 कामगार ठार झाले. त्यानंतर एमआयडीसीतील कटारिया ॲग्रोमध्येही स्फोट होऊन चार मृत्यू आणि तीन गंभीर जखमींची भर पडली. इतक्या मृत्यूंच्या छायेतही स्फोटक कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून सुरक्षेच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारी पावले उचलली जात नाहीत.कोंढाळीजवळील सोलार, चामुंडी, कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स आणि उमरेडमधील एमएमपी या सर्व कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या निकषांची पायमल्ली झाली आहे. कामगारांना सुरक्षेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, प्रशिक्षण, साधने दिली जात नाहीत. काही कंपन्या तर किमान अग्निशमन यंत्रणेसुद्धा ठेवीत नाहीत.

Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक

कामगारांचा जीव असुरक्षित

इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या दुर्घटनांनंतरही जिल्हा प्रशासन, कामगार आयुक्त, आणि उद्योग विभाग केवळ कागदोपत्री कार्यवाही करत आहेत. ज्या गावांमध्ये एकाच वेळी अनेक अंत्यसंस्कार झाले, तिथे शासनाच्या घोषणांची केवळ राख उरली आहे. शासनाच्या धोरणांमध्ये शून्य सहनशीलताच्या घोषणा असल्या, तरी प्रत्यक्षात उद्योगांवर कारवाई न झाल्यामुळे हे धोरण केवळ भाषणांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

नागपूरसारख्या प्रगत औद्योगिक जिल्ह्यात कामगारांचा जीव असुरक्षित असेल, तर राज्याच्या औद्योगिक धोरणावरच प्रश्नचिन्ह उभं राहातं. आता वेळ आली आहे की जिथे स्फोट होतात तिथे फक्त पीडितांना भरपाई देण्यापेक्षा जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावर तातडीने फौजदारी कारवाई होईल, असे धोरण राबवावे. अन्यथा नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक नकाशा मृत्यूच्या कंपन्यांची छायाचित्रं म्हणून ओळखला जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!