महाराष्ट्र

Maharashtra : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नवा पट

IAS Transfers : महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत नव्या प्रवाहांची लय

Author

महाराष्ट्रात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल झाले आहेत.

राज्यातील प्रशासकीय क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते, त्यानंतर आता पुन्हा पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल होत आहेत.

नवीन आदेशानुसार, काही अधिकाऱ्यांची बदली विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदांवर करण्यात आली आहे. विशेषतः मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बदली झालेल्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

शासकीय नियुक्ती 

प्रशासकीय बदल्यांचे हे चक्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची नागपूर येथे विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पालवे यांना मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. नगर प्रशासन संचालकपदी कार्यरत असलेले मनोज रानडे यांची पालघर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच, IAS झेनिथ चंद्र देवंथुला यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड येथे जबाबदारी देण्यात आली आहे.

Bhaskar Jadhav : महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेत्याची प्रतीक्षा 

मध्य प्रदेशमधून स्थानांतर 

IAS अंजली रमेश यांनी मध्य प्रदेश कॅडरमधून महाराष्ट्रात बदली स्वीकारली आहे. अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी IIT मद्रास येथून बी. टेक आणि एम. टेक केले आहे. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशात सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांच्यावर हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

साखळी कायम

गेल्या आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची मुंबई जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच, जळगाव जिल्हा परिषदेचे CEO अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. नांदेड जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करनवाल यांची जळगाव येथे, तर कवली मेघना यांची नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तसेच, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रशासनातील बदल्यांचा प्रभाव

सततच्या बदल्यांमुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठा प्रभाव पडत आहे. अधिकारी बदलले की धोरणेही बदलतात, त्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होतो. नव्या अधिकाऱ्यांसमोर प्रशासनाला गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!