महाराष्ट्र

Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल

Sanjay Gaikwad : शिंदे गटाने झापले, सपकाळांनी कवटाळले

Author

आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघड पाठिंबा दिला आहे.

बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करत राज्यात राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. गायकवाड यांनी पोलिसांना अकार्यक्षम म्हटले आहे. या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना समज देण्यात आली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांना पाठिंबा देत त्यांच्या वक्तव्याला खरं ठरवलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गायकवाड यांच्या घरासमोर त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला.

घराला उडविण्याचा कट रचण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या गेल्या. तब्बल सात ते आठ वर्षे उलटूनही आरोपींचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. सपकाळ यांचा आरोप आहे की बुलढाणा शहर आता गांजा आणि नशेच्या पदार्थांचा हब बनत चालला आहे. तसेच अवैध रेती तस्करीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी सांगितले की गायकवाड यांनी हे पूर्वीच ठरवलेलं असल्यामुळे पोलिसांकडून त्यांनी गाडी देखील धुवून घेतली आहे. गायकवाडंच बोलणं एकदम बरोबर आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा कुठे तरी अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते, असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.

Gadchiroli : जिथे स्वप्नही पोहोचले नव्हते, तिथे आली एसटी 

मुख्यमंत्र्यांकडून दखल

गायकवाड यांच्या या विधानाने सत्ताधारी गोटात मात्र चांगलाच भडका उडवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत गायकवाड यांना कठोर शब्दांत समज दिली. महाराष्ट्र पोलीस दल त्याग, शौर्य आणि कर्तव्यपरायणतेचे प्रतीक आहे. 26/11 च्या हल्ल्यापासून ते आजवर पोलिसांनी दाखवलेला शौर्याचा इतिहास विसरता कामा नये, असे शिंदे यांनी ठणकावले. शिंदे यांनी स्पष्ट केले की काही व्यक्तींच्या अपयशामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेवर शिंतोडे उडवणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक आहे. वर्दीचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाने सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण केली असली, तरी राज्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केल्याचे अनेकांचे मत आहे. आता यानंतर सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात कोणती भूमिका घेतो आणि विरोधक त्यांच्या पाठिशी किती ठाम राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!