महाराष्ट्र

आपली फसवणूक झाल्याचा Eknath Shinde यांना संशय

शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून Sanjay Raut यांचा दावा 

Author

विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदार सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारां विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सातत्याने आक्रमक होत आहेत. या काळात संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांसह भाजपवर जोरदार टीका टिपणी करत आहेत. आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना निशाणा साधत आणखी दावे केले आहेत.

आपला अपमान होईल या दुःखामुळे एकनाथ शिंदे हे युतीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. शिंदेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन वृद्ध दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही राहिलेले नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा: Ajit Pawar

शाह यांनी दिले होते आश्वासन

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आमदार आणि त्यांच्यात विमानात झालेल्या संभाषणाबाबतही राऊत यांनी लिहिले आहे. तुमच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत खर्च करा, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिले होते. त्यानंतर शिंदे यांनी निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च केला, परंतु शाह यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांना आता वाटू लागले आहे”, असे शिंदे यांच्या एका आमदाराने आपल्याला सांगितल्याचे संजय राऊत यांनी लिहिले आहे.

संजय राऊत यांनी पुढे लिहिले की, याच आमदाराने मला महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांचे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप करण्यात येत आहेत, असे शिंदे यांना खात्रीने वाटते. आपल्या हालचालींवर दिल्लीच्या तपास संस्था कडक लक्ष ठेऊन आहे, असा संशय एकनाथ शिंदे यांना आहे, असे संजय राऊत यांनी लिहिले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात दणदणीत विजय प्राप्त केला सत्ता कायम राखली. यामध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!