महाराष्ट्र

शिवसेना गटांमधील स्नेहभोजनाचे Political वादळ

नवनिर्वाचित आमदारांना Shrikant Shinde यांच्याकडून निमंत्रण 

Author

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्नेहभोजनाची निमंत्रण देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांना विधीमंडळ सचिवालयातर्फे खास प्रशिक्षण देण्यासाठी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलावण्यात आले आहे. दिल्लीतल्या विधानसभा सचिवांकडून या आमदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शाळेत विधीमंडळाच्या प्रक्रियांविषयी मार्गदर्शन दिले जात आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत असलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, हे निमंत्रण शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या काही आमदारांनाही देण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांनी एकमुखाने या निमंत्रणाला नकार दिला आहे.

मर्यादा ओलांडाल तर परिणाम भोगाल ! Devendra Fadnavis यांचा दोघांनाा इशारा

स्पष्ट नकार

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील कटुता सर्वश्रुत आहे. त्यामुळेच ठाकरे गटाच्या आमदारांनी या निमंत्रणाकडे दुर्लक्ष करणे स्वाभाविक होते. दिल्लीत उपस्थित असलेल्या अनेक ठाकरे गटाच्या आमदारांनी स्नेहभोजनाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर काहींनी तर आपल्याला निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगितले आहे.

ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे, वरूण सरदेसाई आणि गजानन लवाटे हे आपल्या मतदारसंघात असल्याने ते दिल्लीत हजर नाहीत. त्यामुळे काही जणांना निमंत्रण मिळाले नसले, तरी उपस्थित असलेल्या सातही ठाकरे गटाच्या आमदारांनी या स्नेहभोजनाला न जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

समिकरणा आणि संकेत 

या निमंत्रणामागे राजकीय हेतू असल्याचा कयास लावला जात आहे. एकीकडे, नवनिर्वाचित आमदारांचे विधीमंडळातील कामकाज समजून घेण्यासाठी ते दिल्लीत आलेले असताना, दुसरीकडे एका गटाने दुसऱ्या गटाच्या आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देणे, याला वेगवेगळे अर्थ दिले जात आहेत.

याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या निमंत्रणाला प्रतिसाद न दिल्याने, दोन्ही गटांतील दरी अद्याप तशीच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रशिक्षण दौऱ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये. सिद्धार्थ खरात (मेहकर), गजानन लवाटे (दर्यापूर), संजय देरकर (वणी). अनंत (बाळा) नर (जोगेश्वरी पूर्व ), हरुन खान (वर्सोवा ), वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व). महेश सावंत (माहीम). मनोज जामसुतकर (भायखळा). बाबाजी काळे (खेड आळंदी). प्रवीण स्वामी (उमरगा) यांचा सामावेश आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!