महाराष्ट्र

राजकीय खेळ बदलणारं Sanjay Shirsat यांचं भाकीत

शिंदे-ठाकरे यांचं एकत्रिकरण जवळपास अशक्य

Author

संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याची शक्यता फेटाळली आहे. त्यांच्या या ‘कोलांटउडी’ मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.

राजकीय वातावरणात नेहमीच गदारोळ असतो, पण महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच वेळा नेत्यांचे वक्तव्य चर्चेचा विषय बनतात. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक महत्वाचे आणि वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं अशक्य आहे. दरम्यान, शिरसाट यांच्या या ‘कोलांटउडी’ मुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. शिरसाट यांनी 4 दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बोलले होते कि शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.

शिरसाट यांनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुनः एकत्र येण्याची शक्यता फेटाळली आहे. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे गटाने आपली धोरणं पूर्णपणे बदलली आहेत. ते आता हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा कधीही साक्षात्कार होणं शक्य नाही, असं शिरसाट म्हणाले. स्व. सावरकर यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांच्या बाजूला ठाकरे गट जाऊन बसला आहे, यामुळे त्यांचा एकत्र येण्याचा प्रश्न मिटला आहे, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटाची स्थिती आता इतकी बदलली आहे की, उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र येणं सर्वसामान्यपणे अशक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

ऑपरेशन टायगरचा Mahavikas Aghadi नेत्यांना दणका

महायुतीचं ध्येय

शिरसाट यांच्या विधानावर वाद झाला असला तरी, त्यांनी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या तयारीचेही खुलासा केला. शिरसाट म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाने महायुतीसोबत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. आम्ही प्रत्येक वार्डमध्ये तयारी केली आहे आणि आमच्या संपर्कात अनेक नेते, कार्यकर्ते आणि खासदार आहेत, असं ते म्हणाले. तसेच, त्यांनी भाजपच्या स्वबळावर होणाऱ्या तयारीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. जर भाजपने स्वबळाची तयारी केली, तर तो त्यांचा निर्णय आहे. पण शिवसेना प्रत्येक वार्ड मध्ये तयारी करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात मुंबईतील अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. त्यांचं म्हणणं होतं की, मुंबई महापालिका कामकाजासंदर्भात काही संकटे निर्माण झाली आहेत. काही कंत्राटदारांचे पैसे थकल्याचे सांगताना, शिरसाट यांनी असे म्हटले की, माझी लाडकी बहिण योजना आणि इतर विकास योजनांवर खर्च झाला आहे, त्यामुळे काही कंत्राटदारांचे पैसे थकल्याचे आहे. तरीही, त्यांनी स्पष्ट केलं की, काम थांबवले नाही. हा वाईट काळ आहे, पण योजना थांबवता येणार नाहीत. अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी काहीतरी योग्य दिले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Finance Minister खडूसच असायला पाहिजे

पालकमंत्री संदर्भात एकत्र निर्णय

शिरसाट यांच्या विधानावरून, मुंबईकरांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठकीत पालकमंत्री संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

हे सारे विधान आणि वादग्रस्त वक्तव्ये एकाच गोष्टीकडे सूचित करतात: महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात मोठे बदल होऊ शकतात. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांच्या एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे, पण शिवसेनेची आणखी काय तयारी आहे, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!