महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : राजकारण विसरून लग्न सोहळ्यात रमले शिंदे गटाचे आमदार

Buldhana :  गायकवाड साहेबांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्कार समारंभांची नशा मोठी

Author

बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड विकासकामांपेक्षा लग्नसमारंभांना हजेरी लावत असल्याने जनतेमध्ये संताप वाढू लागला आहे. जिल्ह्यात रस्ते, पाणी, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर आहेत.

विदर्भातील अनेक जिल्हे आजही विकासाच्या रांगेत शेवटीच उभे आहेत. कुठे पाण्याची टंचाई, कुठे रस्त्यांचे खड्डे, तर काही गावं अशी जिथे अजूनही एक साधा पूल नाही. पण आपल्या नेत्यांचं लक्ष मात्र या समस्यांवर नाही, तर लग्नसमारंभ, बारसे आणि वाढदिवसांच्या गर्दीतच अडकलंय. विकासाच्या नावाने गाजर दाखवायचं आणि मग सोहळ्यांच्या पंगतीत मिसळून जायचं हेच सध्या सुरू आहे.

बुलढाण्यात पाणी, शिक्षण आणि रोजगारासाठी लोक झगडत असताना आमदार मात्र साखरपुड्यांमध्ये हजेरी लावताना दिसतात. विकासकामं मागे पडली, प्रश्न वाढले, पण लोकप्रतिनिधींचा पत्ता नाही. की विकासाच्या फाईलीही आता गोडधोड कार्यक्रमांत गहाळ झाल्या? अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होताना यांना जनतेच्या प्रश्नांची आठवण येत नाही का? आता मात्र जनता चिडली आहे आणि उत्तरं मागू लागली आहे.

Chandrashekhar Bawankule : स्पीड मेट्रोची, सिक्युरिटी पोलिसांची

बुलढाण्यात दुष्काळ

संजय गायकवाड हे बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र या आमदारांचं लक्ष  लग्न सोहळ्यात जास्त असल्याचं तिथली जनता बोलू लागली आहे. लग्नात शामिल झाले, नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्यासोबत फोटो काढले, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले, पण जिल्ह्याच्या समस्यांबाबत एकही शब्द नाही. एवढेच नाही, तर अशा समारंभांमध्ये हजेरी लावून भोळ्या ग्रामीण मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

बुलढाण्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. अमरावती विद्यापीठाच्या मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी धडपड करावी लागते. अनेक उपकेंद्रे बंद झाली आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्योगांचा विकास ठप्प आहे, परिणामी युवकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. मर्यादित बससेवा, रस्त्यांची दुरवस्था, मूलभूत सुविधा याकडे कोणीही लक्ष देत नाही, असा आरोप विरोधक करीत आहे.

Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’

लग्न संपलेच नाही

अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यात महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. महापुरुषांचा सन्मान करणे हे नक्कीच आवश्यक आहे, पण केवळ पुतळे उभारून प्रश्न सुटतील का? शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याऐवजी पुतळे उभारण्यातच धन्यता मानली जात आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी कुणी पुढे येत नाही. मात्र त्यांच्याच आमदारांचे समारंभ काही संपायचे नाव नाही आहे.

बुलढाणा हा ग्रामीण भागांमध्ये मोडतो आणि येथे मतदार सहजपणे भावनिक होतात. काही नेते याचाच फायदा घेत भोळ्या मतदारांना समारंभांमध्ये सहभागी होऊन प्रभावित करत आहेत. मात्र, त्याच वेळी रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. राजकारण्यांची शैलीच बदलली आहे. आता मतदारसंघात विकासकामांसाठी फिरण्याऐवजी ते विवाह आणि तेरवीच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यातूनच स्पष्ट होते की, जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. विकासाच्या नावाखाली निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत.

Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली

मागासलेला जिल्हा

विदर्भातील हा जिल्हा आजही अनेक बाबतीत मागासलेला आहे. मोठे उद्योग नाहीत, त्यामुळे रोजगाराची संधी नाही. शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत, त्यामुळे युवकांना पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ग्रामीण भागात अजूनही चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. यावर उपाय काढण्यासाठी कोण पुढे येणार? असा सवाल इथे उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!