
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेची जोरदार चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मोहिमेची खिल्ली उडवत तीव्र टीका केली आहे.
राज्यातील राजकारण आता धगधगत्या टप्प्यावर पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर मोहिमेमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसत आहे. दररोज कोणीतरी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहे. मात्र, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उघडपणे प्रतिक्रिया देत, शिंदेंच्या मोहिमेची खिल्ली उडवली आहे.
पवार यांनी थेटपणे सांगितले की, ऑपरेशन टायगर सारखे काहीही सुरू असल्याची त्यांना कल्पना नाही आणि त्यांनी या संपूर्ण प्रकाराला हसण्यावारी नेले. विशेष म्हणजे, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हलके में मत लो या वाक्यावरही थेट निशाणा साधला. पवार म्हणाले, मराठीत हा शब्दच नाही, मग त्याचा अर्थ काय? अशा शब्दांत त्यांनी शिंदेंच्या आव्हानाला खोचक प्रत्युत्तर दिले. यामुळे शिंदे गटाच्या रणनीतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Parinay Fuke: यांच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांना मोठा दिलासा
महायुतीत इनकमिंग
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी गटाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. विधानसभेतही महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून 232 जागा जिंकल्या. पण आता विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्याआधीच मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू करून मोठे नेते आणि कार्यकर्ते आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे गटाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः गाव पातळीवरही मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सुरू असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य करत शिंदेंच्या मोहिमेची खिल्ली उडवली आहे.
Narendracharya Maharaj : नागरिकांच्या संतापाच्या लाटेत विजय वडेट्टीवार
शिंदेंना सडेतोड प्रत्युत्तर
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना थेट इशारा देत ‘हलके में मत लो’ असे वक्तव्य केले होते. मात्र, या वाक्यावर शरद पवारांनी थेट आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले, हा शब्द मराठीत नाही, मग हे प्रकरण तरी काय आहे?”पवारांच्या या विधानामुळे शिंदे गटावर जोरदार टीका होत आहे.
शिंदे यांनी ठाकरे गटाला धमकी दिली का, की ही केवळ राजकीय डरकाळी आहे, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी मात्र थेट शिंदेंच्या शब्दांनाच आव्हान दिले आहे. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पवार यांचे हे वक्तव्य शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे. कारण मराठी अस्मिता आणि भाषा यासंदर्भात केलेल्या त्यांच्या टीकेने अनेकांना विचार करायला लावले आहे.
मर्सिडीज मुद्द्यावर खळबळ
येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हे यांनी दावा केला की, एका पदासाठी उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडीज द्याव्या लागतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, ठाकरे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
शरद पवारांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत, संजय राऊत यांच्या वक्तव्यालाच दुजोरा दिला. पवार म्हणाले, राऊत जे म्हणाले ते 100 टक्के बरोबर आहे आणि नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल असे बोलण्याची गरज नव्हती. त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, या वादाच्या मुद्द्यांमुळे अधिवेशनातील सकारात्मक चर्चा ढासळली आणि गोऱ्हे यांनी हा विषय मांडूच नये, असे त्यांनी सुनावले.
ठाकरे गटाला धक्का
राज्यातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवणारे तज्ज्ञ म्हणतात की, महाविकास आघाडीत आतापर्यंत जो एकजुटीचा दिखावा केला जात होता, तो आता पूर्णपणे मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काहीशा अस्वस्थ चर्चा झाल्या.
शरद पवारांनी जरी असे म्हटले की, सर्व खासदार आपल्या पक्षात राहतील आणि फुटण्याचा विचार नाही, तरीही अंतर्गत गटबाजीला बळ मिळू लागले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते पक्षाच्या भविष्यासंदर्भात संभ्रमात आहेत. एकनाथ शिंदे यांची ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम जसजशी जोर धरते आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.