महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या घराघरात सौरशक्तीचा प्रकाश

Mahayuti government : ऊर्जेच्या निर्णयातून फडणवीसांनी जिंकली जनतेची मने

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

राज्याच्या जनतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लोकहिताचा निर्णायक मार्ग स्वीकारला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या खिशावरचा भार कमी करण्यासाठी फडणवीस सरकारने सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत विजेचा निर्णय घेतला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरात उजेड कायमस्वरूपी प्रस्थापित व्हावा, यासाठी 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना आता मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे.

सतत वाढणाऱ्या विजेच्या दरांनी त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला ही घोषणा दिलासादायक ठरत आहे. केवळ गरीबच नव्हे, तर मध्यमवर्गीयांनाही सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार असल्याने ही योजना अधिक व्यापक आणि लोकाभिमुख ठरणार आहे.

Vijay Wadettiwar : सद्भावना मार्चमधून शांततेचा संदेश

शेतकऱ्यांसाठी मोफत वीज 

राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्धार फडणवीस सरकारने केला आहे. शेतीसाठी वीज उपलब्धतेचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून गंभीर होता, पण आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करत सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात उजळा आणण्याचे काम हाती घेतले आहे.

सिंचन प्रकल्प, ऊर्जा निर्मिती आणि सौर योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्प आणि वाढोणा-पिंपळखुटा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी आणि वीज या दोन्ही आवश्यक संसाधनांचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. त्यामुळे शेतीला उर्जितावस्था मिळणार असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

Harshwardhan Sapkal : लाडकीचं प्रेम निवडणुकीपुरतेच

स्मार्ट मीटरमुळे फायदा

फडणवीस सरकारने घोषित केलेल्या योजनांनुसार 100 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांच्या दरात 17 टक्के कपात होणार आहे. यामुळे 95 टक्क्यांहून अधिक घरगुती ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. विजेचा वापर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून केला गेल्यास दिवसा विजेवर 10 टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना ऊर्जेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

ऊर्जेच्या या क्रांतीमुळे केवळ घरगुती अर्थसंकल्प नाही, तर राज्याच्या आर्थिक नियोजनावरही सकारात्मक परिणाम होणार आहे. सरकारने विजेच्या वापरासाठी शिस्तबद्ध आणि पर्यावरणस्नेही धोरण स्वीकारले आहे. यामुळे सौरऊर्जेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!