महाराष्ट्र

भविष्यात Raj Thackeray ठरू शकतात Politics मधील गेम चेंजर

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अचानक भेटीने मनसैनिकांची कॉलर झाली टाईट 

Author

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस – राज ठाकरे यांच्या अनपेक्षित भेटीमुळे मनसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या आणि सध्या राज्यातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन राज ठाकरेंची भेट घेणं ही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब मानली जात आहे. त्यामुळेच मनसेत उत्साहाची लाट पसरली आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंची स्वतः जाऊन भेट घेतली म्हटल्यावर मनसैनिकांची कॉलर टाइट झाली आहे. राज ठाकरे भविष्यातील ‘गेम चेंजर’ ठरू शकतात का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

राज्यातील श्रमिक Maharashtra Budget मुळे तणावात

चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट नक्की कशासाठी झाली, यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मनसेची ताकद आणि भूमिका काय असणार, याबाबत या चर्चेने वेगळेच वळण घेतले आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या भाषणशैलीला आणि थेट मुद्द्यावर बोट ठेवण्याच्या शैलीला प्रचंड जनसमर्थन लाभत असते. अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर भाजपसह विविध पक्षांना धारेवर धरले आहे. त्यामुळेच भाजपने त्यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी सुरू केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कधी रस्त्यातच Bus बंद पडते तर कधी धावत्यावेळी छप्परच उडते 

नव्या समीकरणाची शक्यता

भाजप आणि मनसे यांच्यातील संबंध कायमच मिश्र राहिले आहेत. काही मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे विचार मिळतेजुळते दिसले असले, तरी अनेक वेळा राज ठाकरेंनी भाजपवर टीका देखील केली आहे. मात्र, फडणवीस यांची ही भेट दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात एका नव्या समीकरणाची शक्यता निर्माण करत आहे.

मनसेचा कार्यकर्ता वर्ग या भेटीमुळे जबरदस्त उत्साहित झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे असे त्रिकोणी समीकरण तयार होऊ शकते का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जर हे समीकरण प्रत्यक्षात आले, तर राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘गेम चेंजर’ ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बंदूक Ranveer Allahbadia याच्या खांद्यावर अन् निशाणा Narendra Modi यांच्यावर 

मनसेला मिळू शकते नवसंजीवनी

मनसेला महाराष्ट्रातील मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाची निवडणुकीतील ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. अशा वेळी भाजप-मनसे युती झाल्यास, मनसेला नवसंजीवनी मिळू शकते. भाजपला देखील मनसेच्या कट्टर मराठी मतदारांचा फायदा होऊ शकतो.

या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि मनसे एकत्र आले, तर महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक होती, की राजकीय भूकंपाची सुरुवात? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे. राज ठाकरे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, आणि भविष्यात ते ‘गेम चेंजर’ ठरू शकतात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!