प्रशासन

Amravati : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्यावर गदा

Sunil Deshmukh : मजीप्राच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस नेते मैदानात

Author

अमरावतीत भीषण पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांसाठी काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी मजीप्रा प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

पश्चिम विदर्भात काही दिवसांपासून नागरिकांना सतत त्रास देणाऱ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. विशेषतः अकोला, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये विजेचा खेळखंडोबा, पाण्याचा तुटवडा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध न होण्यामुळे जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या समस्यांना तोंड देताना नागरिकांच्या आवाजाला ऐकणारा प्रशासन अजूनही निष्क्रिय असल्याचा आरोप आहे. यामुळेच आता अमरावती शहराचे काँग्रेस नेते सुनील देशमुख पुढे सरसावले आहेत. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.

जनतेचा आवाज बनत त्यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांचा पाण्यावर हक्क आहे. तो मिळत नसेल तर आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत देशमुखांनी मजीप्राच्या मनमानी कारभारावर निशाणा साधला.शहरातील बहुतांश भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा नित्याचा झाला आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदाच पाणी येते, तेही इतक्या कमी दाबाने की सांडपाण्यासारखं वाटतं. काही भागांमध्ये तर नळांमधून थेट काळसर वास येणारं दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत.

Harish Pimple : मूर्तिजापुरात बस सेवेच्या माध्यमातून जोडली नवी स्वप्नं

बैठकीत संतापाचा सूर

अशी परिस्थिती पाहता काँग्रेसच्या वतीने अमरावती शहरातील मजीप्रा कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, रामेश्वर अभ्यंकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत बोलताना सुनील देशमुख यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर चांगलीच चपराक मारली. पाणीपुरवठा ही मूलभूत गरज आहे. ती पूर्ण करण्यात प्रशासन अयशस्वी ठरत असेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

देशमुख पुढे म्हणाले, मजीप्रा प्रशासनाचं नियोजन म्हणजे निव्वळ देखावा आहे. योजना कागदावर, अंमलबजावणी शून्य. पिण्याच्या पाण्याऐवजी नागरिकांना आजार मिळतोय, आणि त्यावर उत्तरं कुणाकडेच नाहीत.त्यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आणि दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे आदेश दिले. अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने ‘मडके फोडो आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांत रोष निर्माण झाला असून, जर त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी दहशतही व्यक्त करण्यात आली आहे.

Amravati : कृषी शिक्षणात उगवले भ्रष्टाचाराचे बीज

प्रशासनाने जनतेच्या मूलभूत हक्कांचा सत्कार करावा आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करावी, यासाठी सर्व स्तरांवर आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!