महाराष्ट्र

Sunil Tatkare : महायुती सोडायचं नसेल तर मिटकरींनी जपून बोलावं

NCP vs NCP : एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

Author

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पांडुरंगाची इच्छा असेल तर एकत्र येऊ असे विधान करत दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाला चालना दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या नवीन वारे वाहू लागले आहे. ठाकरे बंधुंच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात रंगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना किंचित मंदावलेलं स्वरूप आहे. मात्र, अशातच राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात हलचल उडवली आहे.

मिटकरी म्हणाले, पांडुरंगाची इच्छा असेल, तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीच्या आधीच एकत्र येऊ शकतात. या वाक्यातील गोडसर आशयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढंच नव्हे तर, येत्या 10 तारखेच्या पक्ष मेळाव्यात मोठ्या घोषणांची तयारी असल्याचेही त्यांनी इशार्‍याने सांगितले. त्यामुळे या विधानानंतर चर्चा आणखी तापली आहे. अर्थातच, मिटकरींच्या या वक्तव्याने सर्वांनाच गोड वाटलेले नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून नाराजीचे सूर उमटले आहेत.

Dadarao Keche : भ्रष्टाचाराच्या महामार्गावर आमदारांनी उखडले डिव्हायडर

वरिष्ठांचे स्पष्ट संकेत

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी थेट इशारा दिला, मिटकरींनी बोलताना जपून बोलावं. एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर पुन्हा त्यावर बोलण्याची गरज नाही. तटकरे म्हणाले की, आम्ही राज्यात महायुतीत आहोत, देशात एनडीएमध्ये आहोत. हा निर्णय ठाम आहे. यात कोणताही बदल होणार नाही. यावरून राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना गार पाणी टाकल्याचं स्पष्ट झालं.पक्षाच्या महायुतीतील स्थानावर ठाम भूमिका मांडताना तटकरे यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय एखाद्या व्यक्तीचा नाही, तर सर्व वरिष्ठ नेत्यांच्या एकमताने घेतलेला आहे.

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि मी सर्वांनी मिळून एकत्र निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेनेही याला पाठिंबा दिला आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तटकरे यांच्या या भूमिकेमुळे हे स्पष्ट झालं की एकत्रीकरणाच्या चर्चांना आता पक्षाच्या अधिकृत पातळीवर फारसा वाव नाही. मात्र, मिटकरींच्या विधानामुळे ही आणखी काही दिवस तरी हलताना दिसणार आहे.

Harshwardhan Sapkal : किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक निकालांवर संशय व्यक्त केल्यावर तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. लोकसभेच्या निकालांनंतर पाच मुख्यमंत्री आणि 40-50 मंत्र्यांची घोषणा त्यांनी केली. मात्र, विधानसभेच्या निकालात जनतेने त्यांना चपराक दिली. यश मिळालं की स्वतःचं कर्तृत्व, पराभव झाला की लगेच ईव्हीएमवर संशय हे सरळ दुटप्पी धोरण आहे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना धारेवर धरले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!