महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर आरोपांचा धुराळा

Congress : आरोपांच्या कर्दनकाळातही नतमस्तक नाही

Author

सत्तेच्या भयछायेखाली विरोधकांना गप्प बसवण्याचा डाव रचला जात असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनोवृत्तीवर थेट प्रहार केला. गांधी कुटुंबाच्या राष्ट्रनिष्ठ वारशावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी कडाडून उत्तर दिलं.

देशात सध्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना गप्प बसवण्याचे राजकारण जोमात सुरू आहे. सत्य बोलणाऱ्यांना धमकावण्याचा उद्योग चालू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पार्श्वभूमीवर जोरदार प्रतिकार करत सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले. गांधी कुटुंबावर केले जाणारे आरोप  देशासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या शौर्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.

गुरुग्राम येथील जमीन प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असताना सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना या घडामोडींना सत्तेच्या दबावाचं स्वरूप दिलं. धडका द्या, धमक्या द्या आणि गप्प बसवा, ही सध्या सुरु असलेली राजकीय कार्यपद्धती असल्याचं ते म्हणाले. विरोधकांवर दबाव टाकून त्यांना सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे. गांधी कुटुंब मात्र अशा दबावांना कधीही झुकलेलं नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं.

Gondia : आरोग्य सेवा आयसीयूमध्ये; डिझेलमुळे सेवेला ब्रेक

त्याग अन् राष्ट्रभक्तीचा वारसा

गांधी कुटुंब देशासाठी बलिदानाचं प्रतीक राहिलं आहे. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर आपली संपत्ती राष्ट्रासाठी अर्पण केली होती. इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धाच्या काळात स्वतःचे दागिने देशाच्या मदतीसाठी दिले होते. या कुटुंबातील दोन सदस्यांनी देशासाठी प्राणही अर्पण केले. हा इतिहास साऱ्या देशाला ज्ञात आहे. अशा कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे सत्याला झाकण्याचा आणि जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका सपकाळ यांनी ठेवला.

देशातील सध्याची परिस्थिती पाहता, सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा वापर राजकीय सूडासाठी केला जात असल्याचे वारंवार दिसून येते. केवळ गांधी कुटुंबच नव्हे, तर अनेक विरोधी नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया केल्या जात आहेत. यातून निर्माण होणारा दहशतवाद लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे.

Akola corporation : अकोल्याच्या नळधारेवर पाच दिवसांचे कुलूप

सत्तेच्या अंधारात भीती

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाने काँग्रेसच्या लढाऊ भूमिकेचा पुनः एकदा दाखला दिला आहे. हे केवळ राजकीय समर्थन नव्हे, तर देशाच्या मूल्यांसाठी घेतलेलं उघडं आणि निडर मतप्रदर्शन आहे. सत्तेची भीती दाखवून विरोधकांना गप्प बसवण्याचा डाव उधळून लावण्याची ताकद गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये आजही आहे, हे या विधानातून त्यांनी अधोरेखित केलं.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, ते भीतीखाली झुकणारे नाही, तर सत्यासाठी झगडणारे पक्ष आहे. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची संख्या कमी असली, तरी त्यांचा आवाज सत्तेच्या गर्जनेपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचं यामधून दिसत आहे.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!