
मुंबई-नागपूर महामार्गावरील खामगाव ते बाळापूर या 45 किलोमीटर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महामार्गाची पाहणी करणार आहेत.
भारतातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी देशभरात रस्ते आणि महामार्गांचे जाळे विस्तारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामध्ये विदर्भातील रस्त्यांच्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावरील खामगाव ते बाळापूर या 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. अहमदाबादमधील एक कंपनी या रस्त्याचे काम करत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे 95 टक्के कामही पूर्ण झाले आहे.
नितिन गडकरी यांचा विदर्भातील पायाभूत सुविधांचा विकास हा प्रदेशाच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 5 मे 2025 रोजी गडकरी अकोला दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यावर असतांना या रस्त्याचे निरीक्षण करणार आहेत. अकोल्याला आजही विकास कामांची प्रतीक्षा आहे. अकोलेकरांना नेहमीच आश्वासनांच्या गाजराशिवाय काहीही मिळत नाही. पण नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामुळे अकोल्याला काही प्रमाणात विकास कामे दिसतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. कारण तो व्यापार आणि मालवाहतूक यासाठी सोयीचा असणार आहे.

Maharashtra : शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बनतील गार्डियन्स
नवी भारताची समृद्धी
प्रकल्पामुळे विदर्भाशी इतर राज्यांचा कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यावसायिक दृष्टीने याचा मोठा फायदा होणार आहे. कोलकाता- सुरत इकॉनॉमिक कॉरिडॉरला या मार्गाने उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. नवी भारताची समृद्धी साधणारा हा मार्ग सरकारच्या मोठ्या पायाभूत विकासाच्या योजनेचा एक भाग असणार आहे.हा महामार्ग विस्तार न केवळ विदर्भातील रस्त्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर तो अपघातांची संख्या कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटल्या जात आहे. या मार्गावर अनेक वर्षांपासून वाहतूक आणि अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.
काम सुरू झाल्यानंतर या रस्त्याचे चौपदरीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुधारणा केल्या जात आहेत. विशेषतः कोरोना काळात या प्रकल्पावर भर देऊन रस्ता पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्यात आली होती. रस्त्याच्या विस्तारामुळे आणि चौपदरीकरणामुळे वाहतुकीला गती मिळेल आणि मोठ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागा मिळेल. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल आणि नागरिकांना सुलभ, सुरक्षित प्रवास अनुभवता येईल. नितिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. या योजनांमुळे नवा भारत अधिक समृद्ध होईल, आणि विदर्भासारख्या मागे पडलेल्या प्रदेशाच्या विकासात एक नवा प्रवास सुरू होईल.
Vijay Wadettiwar : आज तुमचे दिवस, कल हम भी चुन चुन कर बदला लेंगे