प्रशासन

Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी

Achievement : यशवंत पंचायत राज पुरस्काराने विदर्भाच्या कार्यकर्त्यांचा गौरव

Author

नवीन ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या विदर्भातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा यशवंतराव पंचायत राज पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे.

ग्रामविकास आणि शासनाच्या पातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. यासाठी महाराष्ट्र शासनाने 2022-23 आणि 2023-24 वर्षांसाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रत्येक वर्षी यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांचा स्थानिक विकासातील योगदान अधोरेखित केला जातो. विदर्भातल्याही काही अधिकाऱ्यांना हे पुरस्कार मिळणार आहे.

वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये विदर्भातील काही अत्यंत सक्षम आणि कार्यक्षम ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी निवडले गेले आहेत. या अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यांमध्ये उत्कृष्ठता, प्रशासनातील पारदर्शकता आणि ग्रामविकासासाठी केलेले योगदान सिद्ध केले आहे. 2022-23 साठी ग्रामपंचायत अधिकारी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातून जया पाटील यांना निवडण्यात आले आहे. नरेश शिवंकर भंडारा जिल्ह्यातून निवडण्यात आले. राजू शेंद्रे वर्धा जिल्ह्यातील. राजकुमार पटले गोंदिया जिल्ह्यातून निवडण्यात आले आहेत.

Amravati : यात्रीगण कृपया ध्यान दें, फ्लाइट AMT टेकऑफ के लिए तैयार हैं

नव्या नेतृत्वाची ओळख

कुशाल नेवारे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. विद्या गिलबिले यांना चंद्रपूर जिल्ह्यातून निवडण्यात आले. योगेश्वर उमके अमरावती जिल्ह्यातून. नारायण घुगे अकोला जिल्ह्यातून. शंकर मुजमुले यवतमाळ जिल्ह्यातून, आणि निकेतन सोळंके बुलढाणा जिल्ह्यातून पुरस्कार मिळणार आहे. वर्ष 2023-24 साठी विदर्भातील पुरस्कार प्राप्तकर्ते ओंकार तागडे नागपूर जिल्ह्यातून आहेत. दिनेश धजेकर जिल्हा वर्धा. आशिष भाजीपाले भंडारा जिल्ह्यातून निवडण्यात आले. धर्मराज लांजे जिल्हा गोंदिया जिल्हा. वंदना वाढवे गडचिरोलीतून. मंगेश गोवर्धन चंद्रपूर जिल्ह्यातून निवडले गेले.

मंगला साळुंखे अमरावतीमधून निवडण्यात आले. विजयकुमार ठेंगेकर यवतमाळ जिल्ह्यातून आणि शत्रुघ्न बघे बुलढाणा जिल्ह्यातून समोर आले आहेत. लवकरच यांना हे पुरस्कार प्राप्त होणार आहे. हे पुरस्कार ग्रामविकास क्षेत्रातील नेतृत्वासाठी एक प्रेरणा म्हणून कार्य करतात. पुरस्कार प्राप्त करणारे अधिकारी आपल्या कामामुळे स्थानिक जनतेसाठी चांगले कार्य करत असतात आणि इतर अधिकारी यापासून प्रेरित होतात. ग्रामीण भागातील अधिकारी ज्यांनी विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका पार केली आहे, त्यांना हे पुरस्कार मान्यता देतात.

Nagpur : ना हिंदी, ना मराठी, पण मेट्रो धावली चिमुकल्यासाठी

शासनाने घेतलेली ही योजने ग्रामीण भागातील विकास, सुसज्ज प्रशासन, आणि सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या पुरस्कारांचा उद्देश केवळ अधिकाऱ्यांचे कौतुक करणे नाही, तर सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!