महाराष्ट्र

विदर्भाच्या राजकीय गतिमानतेचा Maharashtra राज्यावर प्रभाव

निवडणूक निकाल आणि Government स्थापनेवरील परिणाम 

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार स्थापनेत विदर्भाचा मोठा प्रभाव आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र आहे. विदर्भातील मतदारांचे कौल कोणाकडे वळते, यावरून राजकीय पक्षांची पुढील वाटचाल निर्भर करते. 

महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर विदर्भ हा नेहमीच निर्णायक घटक ठरला आहे. हा प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. विदर्भातील मतदारांच्या निर्णयाचा थेट परिणाम संपूर्ण राज्याच्या सत्ताकारणावर होताना दिसतो. विशेषतः विधानसभा निवडणुकीत या भागातील जागांचे वाटप हे सरकार स्थापनेसाठी निर्णायक ठरत असते.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विदर्भात मोठे यश मिळवत तब्बल 44 जागा आपल्या खात्यात जमा केल्या. हे यश केवळ भाजपसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांसाठीही महत्त्वपूर्ण ठरले. या विजयामुळे भाजपने राज्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल केली. त्यावेळी मोदी लाट, देवेंद्र फडणवीस यांचे स्थानिक नेतृत्व आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद याचा भाजपाला मोठा फायदा झाला.

यवतमाळच्या शेतकऱ्यांना 232 कोटींचा Financial दिलासा

ताकद पडली कमी 

2019 मध्ये मात्र विदर्भात भाजपाच्या जागांची संख्या 44 वरून 29 वर आली, म्हणजेच पक्षाने 15 जागा गमावल्या. या घटनेमुळे भाजपाच्या विधानसभेतील संख्याबळावर परिणाम झाला आणि राज्यात सत्तास्थापनेची समीकरणे बदलली. शिवसेनेने भाजपासोबत युती तोडली आणि महाविकास आघाडी स्थापन करत कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली.

विदर्भातील या घसरणीमुळे भाजपासाठी राजकीय अडचणी वाढल्या आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळाली. ही घट महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला पूरक ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकत्र येण्यामुळे राज्यातील सत्तासमीकरण पूर्णतः बदलले. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का होता.

फडणवीसांच्या Leadership मध्ये आउटर नागपूरचा झपाट्याने विकास

भाजपचे कमबॅक 

2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भात पुन्हा मोठे यश मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत पक्षाने विदर्भातील अनेक मतदारसंघात विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपच्या या जोरदार पुनरागमनामुळे राज्याच्या सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम झाला आहे.

विशेषतः विदर्भातील ग्रामीण आणि शहरी मतदारांनी भाजपच्या धोरणांना पसंती दिली, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे जोरदार प्रचार केला. केंद्रीय मंत्री आणि विदर्भातील नेत्यांनीही मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून पक्षाची लोकप्रियता वाढवली.

लव जिहादला देवाभाऊ कायद्यानं घालणार बेड्या

सरकार स्थापनेवर परिणाम

विदर्भातील निकालांचा थेट परिणाम राज्यातील सत्ता स्थापनेवर होत असतो. या वेळी भाजपने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्यामुळे राज्यात स्थिर सरकारची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या यशामुळे महायुतीला मोठा आधार मिळाला.

देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातील अन्य स्थानिक नेत्यांनी प्रभावी प्रचार केला. मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवली. सरकारच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेचा विदर्भातील काही भागांमध्ये सकारात्मक परिणाम झाला. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या काही योजनांचा लाभही भाजपला मिळाला. महाविकास आघाडीतील अस्थिरता आणि अंतर्गत संघर्ष यामुळे विरोधकांना मोठे नुकसान सोसावे लागले.

विदर्भ हा महाराष्ट्राच्या राजकीय गणितातील कळीचा मुद्दा राहिला आहे. 2014 मध्ये भाजपला मोठे यश मिळाले. 2019 मध्ये काही प्रमाणात घट झाली. पण 2024 मध्ये त्यांनी पुन्हा प्रभावी पुनरागमन केले. या विजयामुळे राज्याच्या सत्तासमीकरणांवर मोठा प्रभाव पडला आहे आणि भाजपने विदर्भात आपली ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी काळातही विदर्भ हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू राहील, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!