महाराष्ट्र

लाडक्या बहिण योजनेवरून Vijay Wadettiwar यांची सरकारला घेरलं

महायुती सरकारनं Assembly Election नंतर निकष बदलले

Share:

Author

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलल्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महायुतीनं आपला शब्द फिरवला आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले आहेत. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकीच्या काळात सरसकट सर्वांना त्याचा लाभ दिला. निवडणुकीनंतर आता महायुती सरकार सत्तेवर आलं आहे. मात्र लाडकी बहीण योजनेतील निकष बदलण्यात आले आहेत. नवीन निकष लावून लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे. त्यामुळं हे फसवणूक करणारं सरकार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. अनेक बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचंही ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी नमूद केलं की, अनेक बहिणींना रक्कम देण्यात आलेली नाही. त्यांना योजनेतून काढण्यात आलं आहे. ज्यावेळी योजना सुरू केली, त्यावेळीच कठोर निकष ठेवायला हवे होते. मात्र योजना सुरू करताना सरसकट सर्वांना लाभ देण्यात आला. आता निवडणूक जिंकल्यानंतर सरकार आपली भूमिका बदलत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर कटोरा घेऊन भिक मागण्याची वेळ आली आहे. मतं घेतानाच भविष्यात निकष बदलतील असं का सांगण्यात आलं नाही, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

आता बदल चुकीचे

निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही योजनेत बदल करणे चुकरीचे आहे. सत्ता आल्यानंतर निकष लावून महिला लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे हे चुकीचे आहे. हा प्रकार म्हणजे आपलं काम निघाल्यानंतर एखाद्याला फेकण्यासारखं आहे. वापरा आणि फेका ही भाजपची नेहमीची नीती असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणावरही टीका केली. गुन्हा दाखल होण्यास विलंब होणे हे चुकीचं आहे. आरोपीच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी बीडच्या अधिकाऱ्यांनी काम केलं, असं वडेट्टीवार म्हणाले.

मंत्री, सचिव नाही; मानधनही वेळेवर नाही Bacchu Kadu यांनी राजीनामाच दिला

पोलिसांना आरोपीची माहिती असताना वेळ काढूपणा केला. नागपूर हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कऱ्हाड असल्याची चर्चा होती. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोकं प्रयत्न करत आहे. बीड प्रकरणात तिथे नेमल्या जाणारे अधिकारी मंत्र्याचे ऐकतात. खुनासारख्या प्रकरणांचा तपास वेगानं होणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकल्पातील 60 टक्के रक्कम अधिकारी आपसात वाटुन घेतात.

लवकरच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होणार आहे. त्यापूर्वी पालकमंत्री पदावर मंत्र्यांची नियुक्ती होणं गरजेचं असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. 25 जानेवारीला पालकमंत्री नेमण्यात येतील. 26 जानेवारीला झेंडावंदन केलं जाईल. त्यानंतर पुन्हा पालकमंत्री बदलले जातील अशी स्थिती आहे. खाते वाटवापरून महायुतीत वाद आहे. त्यामुळंच कॅबिनेटचा विस्तार विलंबानं झाला. बंगले वाटपावरून वाद झाला. मंत्रालयातील केबिनवरून वाद आहेत. आता पालकमंत्री पदावरूनही वाद असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!