महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली

BJP : संघाची पायरी चढण्याअगोदर टीकेचा पाऊस

Author

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली. त्यांनी भाजपच्या विजयात मोदींचा नव्हे, तर संघाचा करिश्मा असल्याचे सांगितले. आरएसएसच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे, सलग दहा वर्षांनंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भूमीवर पाय ठेवणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहेत. अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही मोदींच्या या दौऱ्यावर टीका करत निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या दौऱ्यावर टीका करताना भाजपच्या विजयात नरेंद्र मोदी नव्हे, तर संघाचा करिष्मा असल्याचे सांगितले. त्यामुळेच मोदी आता नागपूरमध्ये संघ मुख्यालयाला भेट देत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघ व भाजपच्या संबंधांवर नव्याने प्रकाश पडणार आहे.

Buldhana : आरक्षण विभाजनासाठी मातंग समाजाचा फडणवीसांना अल्टिमेट

उदयनराजेंचा संताप योग्यच

विजय वडेट्टीवार यांनी मोदींच्या नागपूर दौऱ्यावर टीका करताना म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी 12 वर्षांनंतर संघ मुख्यालयात येत आहेत. हेच दर्शवते की त्यांचा प्रवास सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे जात आहे.’ त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात नवा वाद उभा राहिला आहे. वडेट्टीवार यांच्या मते, भाजपच्या यशामागे संघाची ताकद आहे आणि आता मोदींनाही याची जाणीव झाल्यामुळेच ते संघाच्या मुख्यालयात जात आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दोन समाजांमध्ये दरी निर्माण करणारा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. संघाच्या 100 वर्षांच्या इतिहासात परिस्थितीनुसार त्यांची भूमिका बदलत राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते, यावरून त्यांच्या विचारधारेचे स्वरूप स्पष्ट होते, संघाच्या विचारधारेवर टीका करताना सांगितले की, ‘संघाचा मूळ अजेंडा विभाजनाचा आहे, तर काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. मात्र, आता संघ 100 वर्षे पूर्ण करत असल्याने त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.’

Gondia : उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना घामाची सबसिडी

नव्या चर्चेला उधाण

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेचेही समर्थन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अपमानावर उदयनराजेंनी व्यक्त केलेल्या संतापावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, ‘उदयनराजे कधी कधी खरे बोलतात.’ त्यांना राग आला की ते स्पष्ट बोलतात. भगतसिंह कोश्यारींपासून महाराजांचा अपमान करणाऱ्यांची यादी काढल्यास हे सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सातत्याने पाठिशी घालत असल्याचे चित्र स्पष्ट होते.पंतप्रधान मोदींच्या या नागपूर दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मोदींच्या उपस्थितीमुळे संघ आणि भाजपच्या संबंधांची नव्याने चर्चा होत आहे. काँग्रेस आणि विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत, तर भाजप समर्थक या दौऱ्याला ऐतिहासिक महत्त्व देत आहेत. मोदींची नागपूर भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कितपत महत्त्वाची ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!