महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मंत्रालयातूनच करावा लागेल भ्रष्टाचाराचा खात्मा

Enforcement Directorate : नागपूरच्या घोटाळ्यावर विजय वडेट्टीवारांचा रोष

Post View : 45

Author

विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात सर्वच स्तरावर भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मंत्रालयापासून शिक्षण विभागापर्यंत कमिशनशिवाय कामे होत नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या गर्तेत मंत्रालयापासून जिल्ह्यापर्यंत खळबळजनक वाढ झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या न्यायाच्या प्रवासाला अडथळे निर्माण होत असल्याचा जोरदार आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंत्रालयातील सुरुवातीपासून प्रशासनाच्या तळघरापर्यंत कमिशनशिवाय कोणतेही काम होत नाही, अशी संतप्त टीका त्यांनी केली आहे.

नागपूरात झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी थेट भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना म्हटले की, वित्त विभागातून विविध खात्यांना वितरित होणारा निधी देखील कमिशनशिवाय पुढे सरकत नाही. ही परिस्थिती थांबवायची असेल तर मंत्रालयापासूनच शुद्धीकरणाची सुरुवात करावी लागेल, असे ते ठामपणे म्हणाले.

Harshwardhan Sapkal : ईडीने स्वत:च्या पुराव्यांना लावली आग

शिक्षण विभागाला हादरा

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील शैक्षणिक, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य यासारख्या क्षेत्रांत देखील निधीचे वितरण करताना दलालीची सक्ती केली जात आहे. विभागीय अधिकारी, कंत्राटदार, पुरवठादार यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय कोणतेही पेमेंट होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, जर खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर केवळ बाह्य तपासणी पुरेशी ठरणार नाही. मंत्रालयातील भ्रष्ट वर्तणुकीवर थेट हातोडा मारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे पैसे कमिशनच्या आगीत भस्मसात होत राहतील, अशी गंभीर टिप्पणी वडेट्टीवार यांनी केली.

नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्याची दखल घेत वडेट्टीवार यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषी संस्थाचालक, शिक्षक भरती प्रक्रियेतील दोषी अधिकारी यांना कोणतीही माफी दिली जाऊ नये. ते म्हणाले की, या प्रकरणात चौकशी करताना निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये. ईडीने आणि स्पेशल कमिटीने पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करावी. जेणेकरून शिक्षण व्यवस्थेतील खोटेपणा कायमचा संपुष्टात येईल.

Nagpur Municipal Corporation : गळतीला जबाबदार उपअभियंता निलंबित

ईडीची चौकशी

शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने एन्ट्री घेतल्याने संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आधीच 7 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ईडीने आता गुन्ह्यांची प्रत, रिमांड कॉपी, बँक खात्यांचा तपशील आणि संपूर्ण तपास अहवाल मागविला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर आता कारवाईची तलवार टांगली आहे. नागपूर सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. एनआयसी व महाआयटी सर्व्हरकडूनही माहिती मागवली जात आहे. सुरुवातीला 580 शिक्षकांचा सहभाग समोर आला होता. मात्र आतापर्यंत 622 बनावट आयडी उघडकीस आल्याने घोटाळ्याचा थर वाढला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!