महाराष्ट्र

Parinay Fuke : जलमिशनच्या यशासाठी होणार विचारमंथन

East Vidarbha : तलाव वाचवण्यासाठी एकत्र येणार गावांचे नेतृत्व

Share:

Author

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सरसावले.

पूर्व विदर्भाच्या कोरडवाहू भागांना जलसमृद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा, गोंदियाच्या चौफेर विकासासाठी झटणारे विकास पुरुष माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियानाला बळ मिळाले आहे. या मोहिमेंतर्गत माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवनाचे काम गतीमान होणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर तलावांचे काम नियोजनबद्ध करण्यासाठी डॉ. फुके यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्णयामुळे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला वेग येणार आहे. पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या समंजस्य करारानुसार, जिल्ह्यातील तलाव खोलीकरणाचे काम नियोजनबद्ध रितीने होणार आहे. या उपक्रमासाठी 24 एप्रिल 2025 रोजी गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी 12 वाजता एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतील.

Akola : विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ॲक्शन मोडमध्ये 

मंत्र्यांचा पाठपुरावा

नियोजित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकही यात सहभागी होतील. तालुक्यातील तलावांचे गाळ काढण्याचे नियोजन यावेळी सखोलपणे मांडले जाईल. भंडारा जिल्ह्यातील कार्यशाळा 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात पार पडणार आहे. संबंधित गावांचे प्रतिनिधी आपल्या गावातील तलावांची माहिती घेऊन या कार्यशाळेत सहभागी होतील,असे आवाहन डॉ. फुके यांनी केले आहे. पूर्व विदर्भ पाणीटंचाईने त्रस्त आहेत. या भागातील भूस्तर हे रूपांतरीत खडकांचे आहे.

गोंड राजांच्या काळात बांधले गेलेले 6 हजार 700 माजी मालगुजारी तलाव आता गाळाने भरले आहेत. त्यामुळे त्यांची सिंचनक्षमता कमी झाली आहे. माजी मंत्री  आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत राज्य शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला होता. सरकारने अखेर तलाव पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे जलसंधारणासोबतच पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. या निर्णयानुसार, तलाव खोलीकरण करताना बाहेर काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारले जाणार नाही.

Maharashtra : मुख्यमंत्र्यांचे कुबेर डावपेचकार; मास्टरप्लॅननं विकासाचं चक्र फिरवणार 

नागरिकांना फायदा

उपक्रमामुळे कामाला वेग येईल आणि गाळाचा उपयोग शिवारात माती सुधारणा, सार्वजनिक मैदानांचे समतलीकरण आणि तलावाच्या किनाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी केला जाईल. या उपक्रमातून फक्त तलावच नव्हे, तर संपूर्ण शिवाराचे रूपांतर होणार आहे. शाळांचे मैदान, क्रीडांगण, अंगणवाडी परिसर यांसारख्या ठिकाणीही ही सुपीक माती वापरली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही याचा थेट फायदा होईल. तलाव पुनरुज्जीवनामुळे पाणीसाठवण क्षमता वाढेल, भूजल पातळी सुधारेल आणि विहिरी व नळपाणी योजनांना चालना मिळेल.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल. मासेमारी व्यवसायास गती मिळेल आणि संभाव्य पूरस्थितीवरही नियंत्रण ठेवता येईल. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारामुळे पूर्व विदर्भातील जलसंपत्ती संवर्धनाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. असा अध्याय जो केवळ पाण्याचे प्रश्न सोडवणार नाही, तर निसर्ग आणि शेतीला नवसंजीवनी देणार आहे.

Bhandara : दीड कोटींचं जलजीवन स्वप्न पाण्यासारखं वाहून गेलं

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!