दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पाच वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ गोंधळ उडवला आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. तर ठाकरे गटाने आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पाच वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयातच उत्तर देऊ. मी अशा राजकारणात पडत नाही; मी कामाचं बोलत असतो.
सत्ताधाऱ्यांची तक्रार
आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन विधानसभेत विरोधी आमदारांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली. त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर विधानसभेचे कामकाज बंद पाडण्याचा आरोप केला. शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यांवर राज्याची परिस्थिती गंभीर आहे. सत्ताधारी पक्षांकडे कोणताही ठोस अजेंडा नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी नेत्यांकडून होत आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी या मागणीला विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “सीआयडी तपासात कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश आढळलेला नाही. कोणाकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत. पण कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे, असे आश्चर्यजनक विधान शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी केला आहे.
खोट्या आरोपांचा दावा
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणाला ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याची साजिश म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, दिशा सालियानच्या वडिलांवर दबाव टाकून आदित्य ठाकरेंविरुद्ध आरोप करवले जात आहेत. हे गंदी राजकारण राज्याचे नाव खराब करत आहे.
दिशा सालियान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक होती. हिचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मलाड येथील एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी त्यावेळी हे आत्महत्येचे प्रकरण म्हणून नोंदवले होते. मात्र, आता तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित भूमिकेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव वाढला आहे. आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा आणि राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.
