महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार

Congress : चांदीच्या ताटात शाही जेवण अन् जनतेच्या खिशावर राजकारण

Author

सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या वादग्रस्त वक्तव्यांची जणू स्पर्धाच लागली आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आपल्या भाषेवर ताबा ठेवायला विसरत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीचा मुद्दा सध्या तापलेला असताना, त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आधीच सरकारवर टीकेची झोड उठली असताना, आता भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटले आहे. ‘शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात’ असे बोलत त्यांनी जणू शेतकऱ्यांच्याच स्वाभिमानाला ठेच दिली आहे.

बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिकार करत भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. वडेट्टीवार म्हणाले, हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा सरळ अपमान आहे. भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे. सरकारी योजना जणू भाजपच्या खिशातून चालवल्या जातात, असा भास निर्माण करणे हे महाराष्ट्राच्या जनतेची थट्टा आहे. ते पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, तुम्ही आज सत्तेत आहात ते या शेतकरी आणि जनतेच्या आशीर्वादाने. गरज पडल्यास हा शेतकरीच तुमचं मूल्य शून्यावर आणू शकतो.

Sunil Mendhe : लोकशाहीला बेड्या घालणारी इंदिरा गांधींची मानसिकता

सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आवश्यक

राज्यात दुसरीकडे आर्थिक संकट घोंगावत असतानाही, मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांसाठी पाच हजार रुपयांची चांदीच्या ताटात मेजवानी आयोजित करण्यात आली. या खर्चीक भोजावर देखील वडेट्टीवारांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची गरज होती का? एका बाजूला शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. विदर्भातील 58 टक्के शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळालेले नाही. अंगणवाडी सेविकांना पगार नाही. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थांबले आहेत. दुसरीकडे चांदीच्या ताटात थाटात जेवण, हा सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.

पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरही वडेट्टीवारांनी सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले, जर महिला पोलिसही सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचे काय? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे असूनही असे प्रकार घडतात म्हणजे राज्यात महिलांसाठी सुरक्षितता शिल्लक राहिली नाही. ही वेळ लाजिरवाणी असून महिलांना वाचवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.राज्यात सध्या शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. विरोधकांची टीका असो किंवा जनतेचा रोष, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात जनतेच्या न्यायासनातून बहिष्कृत होण्याचा धोका स्वतःच ओढवून घेण्यासारखे आहे.

Nagpur : महापालिकेच्या प्लॅनिंगवर पावसाचे थेट ‘LoL’

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!