संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव रंगतदार पद्धतीने सुरू झाला आहे. नागरिक आणि राजकीय नेते बाप्पाचे उत्साहात स्वागत करत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाचा उत्साह 27 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण जोमात अवतरला आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या आगमनाने प्रत्येक घर, गल्ली आणि मनात आनंदाचा सण खुलला आहे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया, अशी भक्तिभावाने प्रार्थना करत महाराष्ट्रातील जनता बाप्पांचे स्वागत करत आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, ढोल-ताशांच्या नादात आणि फुलांच्या सुगंधात गणरायांचे आगमन थाटामाटात होत आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. जो प्रत्येकाच्या हृदयात एकता आणि उत्साहाचा संदेश घेऊन येतो.
अकोला शहरातही हा उत्सव मोठ्या थाटाने साजरा होत आहे. यंदा, अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या घरी साधेपणाने, पण भक्तिभावाने गणरायाचे स्वागत केले. कोणताही बडेजाव किंवा दिखाऊपणा न करता, अनुप धोत्रे यांनी संपूर्ण कुटुंबासह विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. सहकुटुंब सहपरिवार त्यांनी बाप्पांची आरती केली आणि मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दुःखावर मलम लावण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना केली. माझ्या अकोल्यातील प्रत्येक व्यक्तीला सुख, समृद्धी आणि रिद्धी-सिद्धी मिळो, अशी मनोभावे मागणी त्यांनी गणरायांकडे केली.
Operation Shakti : नागपूर पोलिसांचे डिजिटल गरुड आता गुन्हेगारांच्या शोधात
शेतकऱ्यांसाठी बाप्पाचे आशीर्वाद
अनुप धोत्रे यांनी केवळ गणेशोत्सवाच्या स्वागतातच नव्हे, तर आपल्या कार्यातही साधेपणाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी गणरायाकडे केवळ वैयक्तिक मागण्यांपुरतेच मर्यादित न राहता, संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी प्रार्थना केली. अकोल्याचा विकास हा माझा प्राधान्याचा विषय आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांसाठी आणि स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी मी कटिबद्ध आहे, असे धोत्रे यांनी बाप्पांच्या चरणी साकडे घालताना म्हटले. त्यांनी सरकारकडून निधी खेचून आणण्याचे आणि मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचे वचन दिले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी अवकाळी पावसाने आणि कर्जमाफीच्या अभावाने त्रस्त आहेत.
शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर, अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांना आपल्या प्रार्थनेत स्थान दिले. बाप्पा, माझ्या शेतकरी बांधवांवरील संकटे दूर कर आणि त्यांना सुख-शांती दे, अशी भावपूर्ण मागणी त्यांनी केली. अकोल्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेपासून ते वीजपुरवठ्याच्या समस्यांपर्यंत, धोत्रे यांनी प्रत्येक मुद्द्यावर बाप्पांकडे साकडे घातले, जणू गणराया त्यांच्या विकासाच्या स्वप्नांना आशीर्वाद देणारच. गणेशोत्सवाच्या या पवित्र प्रसंगी, अनुप धोत्रे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केलेली प्रार्थना नक्कीच फलदायी ठरेल, अशी आशा आहे. बाप्पांच्या कृपेने आणि धोत्रे यांच्या प्रयत्नांनी अकोला जिल्हा विकासाच्या नव्या वाटेवर नक्कीच पुढे जाईल.
IPS Archit Chandak : विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चप्प्या चप्प्यातून नजर
