महाराष्ट्र

Anil Deshmukh : ‘योग्य वेळे’चं नाटक पुरे आता निर्णय घ्या

Maharashtra : कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी होरपळले

Author

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची मागणी वाढली आहे. खतांचा पुरवठा अपुरा पडत असल्याने आर्थिक तंगी वाढली आहे. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टिका करत त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एकच मुद्दा सातत्याने झळकतोय, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा. विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या प्रचंड आशेवर स्वार होत महायुती सत्तेवर आली खरी, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा शब्द अजून हवेतच विरतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील फक्त घोषणा, भाषणं आणि आश्वासनांची आतषबाजी झाली. प्रत्यक्षात मात्र निर्णयांच्या बाबतीत शांतता. राज्याच्या विविध भागांतील शेतकरी आता संयम सोडून रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने तीव्र होत चालली आहेत. दरवेळी सत्ताधाऱ्यांकडून ‘लवकरच कर्जमाफी’चे वाक्य ऐकायला मिळते, पण ‘लवकरच’चा अर्थ मात्र अजून ठरलेला नाही.

नैसर्गिक आपत्ती, खतांची कमतरता आणि वाढलेले दर या तिहेरी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हीच खरी वेळ आहे कर्जमाफीची, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. राज्यात पेरणीचे दिवस सुरू आहेत. पण डीएपी आणि मिश्र खतांचा पुरवठा अतिशय अपुरा आहे. केवळ 30 टक्के डीएपी खत मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात अडकला आहे, हे लक्षात घेऊन सरकारने त्वरित कृती करावी, असा देशमुखांचा जोरदार आग्रह आहे.

Maharashtra : रहिवासी जमिनीसाठी तुकडेबंदी नियमात मोलाचा बदल

सत्ताधारी आमदार असंतुष्ट

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर उपरोधिक टीका करत म्हटले, फडणवीस म्हणतात, ‘योग्य वेळी’ कर्जमाफी करू. पण ती योग्य वेळ कधी येणार? ते पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात आणि प्रचारसभांमध्ये देण्यात आलेली आश्वासने आता आठवण करून देण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांनी अशा कोणत्याही आश्वासनाचं समर्थन केलेलं नाही, असं म्हणत देशमुख यांनी उपमुख्यमंत्री पवारांवर देखील अप्रत्यक्ष टोला लगावला.देशमुख म्हणाले की, खतांच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सरकारने उशीर न करता खतांचा पुरवठा सुरळीत करावा, दर नियंत्रणात आणावेत आणि कर्जमाफीचा स्पष्ट निर्णय घ्यावा. आंदोलनाच्या कडेला गेलेल्या शेतकऱ्यांना आता फक्त शब्द नकोत, तर कृती हवी आहे.राजकीय समीकरणांवर भाष्य करताना देशमुख यांनी सांगितलं की, अजित पवार गटातील काही आमदार सत्तेत असूनही समाधानी नाहीत. शरद पवार यांना सोडणे ही आमची मजबुरी होती, असे त्यांनी स्पष्ट करत काही ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय विपरीत परिस्थितीत घेतल्याचे खाजगीत मान्य केले, असा गौप्यस्फोट केला.भास्कर जाधव यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले, ते आमचे प्रदेशाध्यक्ष होते.

Pankaj Bhoyar : सभेचा हंगामा गेला पण मैदानाची साफसफाई कोण करणार?

शरद पवार यांची साथ सोडू नये, असे त्यांनाच वाटतंय. जे लोक शरद पवार यांच्यापासून दूर गेले, ते एकांतात भेटल्यावर नेहमीच सांगतात की, परिस्थिती तशी नसती, तर आम्ही साथ सोडली नसती.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की, सरकार दिलेला शब्द कायम ठेवेल. योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या ‘योग्य वेळेचा’ नेमका अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही. तो होईपर्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत फक्त प्रतीक्षाच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!