महाराष्ट्र

RSS : 1920 मध्ये रोवले स्वातंत्र्याचे बीज

Atul Moghe : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा योगदानाचा इतिहास उजळला

Post View : 2

Author

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आपले योगदान ठामपणे स्पष्ट केले आहे. डॉ. हेडगेवारांच्या ऐतिहासिक ठरावापासून आजच्या संघाच्या जागतिक दृष्टिकोनापर्यंत संघाचा वारसा स्फुरतो आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहभागाबाबत अनेकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. काहींनी संघावर ब्रिटिशांसोबत मदत केल्याचा आरोप केला, तर काहींनी त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवला नाही, असे मत मांडले आहे. मात्र संघाच्या शपथपत्रात स्पष्टपणे नमूद आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून मी हिंदूराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित गुरूपौर्णिमा उत्सव कार्यक्रमात सांगितले की, काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मान्य झाला, परंतु त्यापूर्वीच 1920 मध्ये डॉ. केशव हेडगेवारांनी नागपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला होता. ही ऐतिहासिक बाब लक्षात घेऊन संघाने आपले योगदान ओळखण्यासारखे ठरवले आहे.

Loan Waiver : ठरलं तर मग! शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणार हसू

अतुल मोघेंचा दावा

मोघे म्हणाले की, काँग्रेसच्या 1930 मधील अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव 26 जानेवारी रोजी मान्य झाला, ज्याची आठवण म्हणून भारताने संविधानाचा स्वीकार त्या दिवशी केला. संघाच्या इतिहासातील 1920 मधील अधिवेशनात डॉ. ओम यांनी दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडले होते. पहिला प्रस्ताव संपूर्ण स्वातंत्र्याचा तर दुसरा प्रस्ताव भारताच्या जागतिक नेतृत्वाची भूमिका आणि भांडवलशाहीवर मात करण्याची रणनीती यावर केंद्रित होता. डॉ. हेडगेवारांनी मांडलेला प्रस्ताव 1930 मधील अधिवेशनात मान्य करण्यात आला, असेही मोघे यांनी नमूद केले. यावेळी ते म्हणाले की, संघाचा इतिहास फक्त स्वातंत्र्यलढ्यापुरता मर्यादित नसून, अखंड भारत आणि जागतिक नेतृत्वाच्या दृष्टीने संघाच्या योगदानाची भूमिका उल्लेखनीय आहे. प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवताना जागतिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे, कारण आजच्या जागतिक राजकारणात भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न काही देश करत आहेत.

मोघे यांनी सांस्कृतिक विचारांवर भर देत सांगितले की, भारताची खरी ओळख म्हणजे संस्कृतीची जपणूक. वसुधैव कुटुंबकम् या तत्वाचा अमल फक्त भारतात आढळतो. जागतिक व्यापारावरून निर्माण होणाऱ्या वादांत भारताने स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. अमेरिकेचे किंवा रशियाचे राजकारण किंवा त्यांच्या चुकीसाठी भारताला दोष देणे आवश्यक नाही. देशाच्या संस्कृतीचे रक्षण आणि जागतिक नेतृत्व मिळवणे हे संघाचे महत्त्वाचे उद्दिष्ट राहिले आहे. मोघे यांनी पुढे स्पष्ट केले की, संघाच्या इतिहासाची आठवण करून देणे आणि विद्यार्थी, नागरिक यांना जागतिक दृष्टिकोनातून विचार करायला शिकवणे अत्यावश्यक आहे. संघाच्या कार्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील गहिराई लक्षात येते, तसेच भारताच्या सांस्कृतिक ठेव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांवर येते.

Chandrashekhar Bawankule : नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेड अलर्टवर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!