महाराष्ट्र

B.R Gavai : न्यायमूर्ती त्रिवेदींना निरोप सरन्यायाधीशांचा बारवर संताप 

Supreme Court : न्यायालयातील परंपरेला झटका 

Author

न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल संघटनेतर्फे निरोप समारंभ न मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी बार असोसिएशनवर थेट नाराजी व्यक्त करत परंपरेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले.

न्यायव्यवस्थेतील प्रतिष्ठित परंपरेला शुक्रवारी मोठा धक्का बसला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने निवृत्त होणाऱ्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि वकिलांच्या संघटनेवर कठोर शब्दांत टीका केली.

न्यायमूर्ती त्रिवेदी या अधिकृतरित्या ९ जून रोजी निवृत्त होत असल्या, तरी त्या एका कौटुंबिक सोहळ्यासाठी अमेरिका रवाना होत असल्याने त्यांचा 17 मे शुक्रवारी कार्याचा अंतिम दिवस ठरला. परंपरेनुसार, निवृत्त होत असलेल्या न्यायाधीशांचा शेवटचा दिवस औपचारिक खंडपीठात सरन्यायाधीशांसोबत साजरा केला जातो, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेतर्फे निरोप समारंभाचे आयोजन केले जाते. मात्र, या वेळेस ही परंपरा खंडित झाली.

स्पष्ट भूमिका

आपण थेट बोलतो आणि स्पष्ट मत मांडतो. वकिलांच्या संघटनेने अशा प्रकारची भूमिका घेणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत सरन्यायाधीशांनी आपल्या खंत व्यक्त केली. त्यांनी बार असोसिएशनच्या या निर्णयाची खरमरीत टीका केली आणि न्यायमूर्ती त्रिवेदी यांना न्यायालयीन सेवेसाठी सन्मानपूर्वक निरोप न देणे, हे संपूर्ण संस्थेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे सूचित केले. औपचारिक खंडपीठात कपिल सिब्बल (अध्यक्ष) आणि रचना श्रीवास्तव (उपाध्यक्ष) या वकिलांच्या संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सरन्यायाधीशांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Maharashtra : दोन टप्प्यात होणार ‘स्थानिक’ची निवडणूक

या अभावाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी घडलेली एक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात काही वकिलांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रकरणात बोगस वकालतनामा वापरण्याचा आरोप होता, ज्यामुळे वकिलांची संघटना त्रिवेदी यांच्या निर्णयावर नाराज होती. त्यामुळेच कदाचित या निरोप समारंभाचे आयोजन टाळण्यात आले, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत

या प्रसंगी न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांनीही आपली भावना व्यक्त करत सांगितले, माफ करा, पण मला हे बोलावंच लागेल. परंपरा आणि सुसंस्कृत न्यायव्यवस्था यांचा सन्मान झाला पाहिजे. चांगल्या प्रथा टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. मी न्यायमूर्ती त्रिवेदी यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. त्या अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील, याबाबत मला शंका नाही.

Sleeper Sale : दहशतवादी आकाशातून उतरले अन् सरळ अटकेत गेले

हा प्रसंग केवळ एका न्यायाधीशाच्या निरोपाचा अभाव नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील संस्थात्मक सन्मान, परंपरा आणि सहकार्य यावरील चिंतनाची गरज अधोरेखित करणारा ठरतो. न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या योगदानाला न्यायालयीन इतिहासात महत्त्वाचे स्थान दिले जाईल, परंतु त्यांच्या निरोपात निर्माण झालेला हा शून्य न्यायव्यवस्थेतील अंतर्गत नातेसंबंधांवर खोल परिणाम करणारा मुद्दा ठरू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!