महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : तिघांचा सूर एकच; नाटक नाही, कामच होणार 

Mahayuti : कुठल्याही खात्याचा निधी बेकायदेशीर वळवला नाही 

Author

निधी वाटपावरून शिंदे गटाच्या नाराजीचे सूर उमटत असताना, बच्चू कडूंच्या आंदोलनानेही राजकीय तापमान वाढवले आहे. या साऱ्या घडामोडींवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेत शांततेचा संदेश दिला आहे.

राज्यातील राजकारणात सध्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून वादळ उठले आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी, आदिवासी कल्याण व सामाजिक न्याय विभागाच्या निधीवाटपावर प्रश्नचिन्ह, आणि दुसरीकडे बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन, या साऱ्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांच्या शंकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

सामाजिक न्याय व आदिवासी कल्याण विभागाच्या निधीवाटपावरून काही आमदार नाराजी व्यक्त करत असल्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सांगितले की, अजितदादा हे नेहमीच संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी सल्लामसलत करून निधी वाटप करतात. हा निधी राखीव असतो, त्यात हस्तक्षेप शक्य नाही. कुणीही तो वळवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब कधीही असा अन्याय होऊ देत नाहीत.

कोट्यवधींचा निधी मंजूर 

बावनकुळे यांनी त्यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत देखील माहिती दिली. कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने 240 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात थीम पार्क आणि अन्य आकर्षणांचा समावेश आहे. मंत्री संजय शिरसाठ यांनी या कामासाठी सहकार्य दिले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुलेखा ताई कुंभारे यांनी या भागात केलेल्या कामाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मी एसपी आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्याकडे पाठवले होते. त्यांच्या मागण्या अनेक खात्यांशी संबंधित आहेत. मी त्यांना विनंती करतो की, मुंबईत एकत्र बसून चर्चा करू. चुकीच्या पद्धतीने भाष्य न करता मार्ग काढणं हे अधिक योग्य ठरेल. आंदोलनकर्त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ravindra Chavan : अनुशेषाच्या अंधारातून विकासाचा सूर्य उगवतोय 

मतभेद नाही 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मतभेद असण्याच्या शक्यतेवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाची आहे. महायुती हे सर्वत्र एकत्रच निवडणुका लढणार आहे. कुठे वाद निर्माण झाला, तरी तो मैत्रीपूर्ण मार्गानेच सोडवण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणीही मनभेद निर्माण करणारे वक्तव्य करू नये. तिघं नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही एकाच वेगाने, एकाच दिशा आणि हेतूसाठी कार्यरत आहेत, असेही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.

राजकारणात वैचारिक मतभेद असले, तरी मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया हे सूचित करतात की सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय आहे. निधी वाटप, विकास प्रकल्प, आंदोलकांची काळजी. या सर्व मुद्यांवर त्यांनी दिलेल्या स्पष्ट, संयमित आणि सकारात्मक प्रतिक्रियांनी राज्यातील नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!