महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखा क्रूर

Devendra Fadnavis : सत्तेच्या निर्णयांवर सपकाळांचा प्रहार

Post View : 15

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीस-औरंगजेब तुलना प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना थेट औरंगजेबाशी केली, ज्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. मात्र, या वादळातही सपकाळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार ज्या प्रकारे जनतेवर अन्यायकारक कर लादत आहे आणि कठोर निर्णय घेत आहे, ते औरंगजेबाच्या कारभारासारखेच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सपकाळ यांनी आपल्या विधानात स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या काळात धर्माच्या आधारे कर लावला जात असे, तसेच आज महाराष्ट्र सरकार सामान्य जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा लादत आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयांचा समाचार घेत शाळेच्या वह्या-पुस्तकांवर, स्मशानभूमीतील लाकडांवर लावलेल्या करांवर टीका केली. त्यांना वाटते की, सध्याच्या सरकारचा कारभार लोकहिताच्या विरोधात जात असून, हा क्रूरतेचा नवा अध्याय आहे.

Ravikant Tupkar : ब्रिटिशांचा वारसा चालवतायत

घणाघाती आघात

सत्ताधारी पक्ष सपकाळ यांच्या विधानावर संतप्त असला तरी, त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले मत ठामपणे मांडले. फडणवीस सरकार जनतेच्या मूलभूत गरजांवर कर लावत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. ही केवळ राजकीय टीका नसून वास्तव आहे,असे सांगितले.

सपकाळ यांच्या विधानांमुळे काँग्रेसचा हल्लाबोल आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भाजपा यावर आक्रमक प्रतिक्रिया देत असली, तरी विरोधक या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणार आहेत. राज्यातील राजकीय रणधुमाळी अधिकच भडकणार असल्याची चिन्हे आहेत. हर्षवर्धन सपकाळांनी हा मुद्दा फक्त राजकीय टीका म्हणून मांडला की ते सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठे आंदोलन उभारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!