महाराष्ट्र

Uddhav Thackeray : अधिवेशनाचा एकमेव फायदा; राज्याला मिळाले एक गाणे

Maharashtra : प्रचंड बहुमत मिळूनही महायुती अस्वस्थ; ठाकरेंचा हल्लाबोल

Author

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत, हे अधिवेशन नेमके कशासाठी घेतले, असा सवाल उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. चार आठवड्यांच्या या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, हे अधिवेशन अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी ठरले का, यावर आता राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या अधिवेशनावर जोरदार टीका केली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेचा भडिमार करताना महायुती सरकारला ‘अस्वस्थ सरकार’ असे संबोधले. एवढे मोठे बहुमत मिळूनही सरकारने आपल्या अपयशाला झाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Nagpur Riots : नुकसानग्रस्तांना सरकारडून सात लाखांचा मदतीचा हात

अधिवेशनात गुन्हे

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हे अधिवेशन म्हणजे सरकारच्या अपयशाला झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न होता.’ सरकारने 100 दिवसांत मोठे बदल घडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या अधिवेशनात त्या संकल्पाचा कुठेही उल्लेख झाला नाही. ना कुठले ठोस निर्णय घेतले गेले, ना कोणत्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली.

अधिवेशनाच्या काळात राज्यात दरम्यान गंभीर गुन्हे घडले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण, स्वारगेटमधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी प्रकाशझोतात येण्यास सुरुवात केली आहे.

Nagpur : प्रशासकीय गतिमानता पुरस्कारांत नागपूर विभागाचे वर्चस्व 

सरकारची गप्पीगप्प

उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या महिला धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘सरकारने लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपये देण्याची घोषणा केली होती, पण आता त्यावर कुठेही चर्चा नाही. उलट त्यांची कागदपत्रे तपासण्याची तयारी सुरू आहे. मतं मागताना सरळ आश्वासनं दिली, पण आता त्यावर संथगतीने प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. यामुळे ही योजना प्रत्यक्षात किती प्रभावी ठरणार, हा मोठा प्रश्न आहे.

ठाकरे यांनी नागपुरातील नुकत्याच घडलेल्या दंगलीबाबतही भाष्य केले. ‘बर्‍याच वर्षांनी नागपुरात मोठी दंगल उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण यात अपयश पदरी पडले. एकनाथ शिंदे यांच्या मनात अद्यापही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न दाटून आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.

Prashant Koratkar : हो, मीच फोन केला; डेटाही डिलिट केला

महाराष्ट्राला काय मिळालं?

जयंत पाटील यांनी या अधिवेशनाचे वर्णन ‘कबरीपासून टांगापर्यंत’ असे करत त्यावर टीका केली. ‘अधिवेशन का घेतले गेले? सरकारने स्वतःलाच हा प्रश्न विचारला पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले, ‘या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले? संपूर्ण देशाला एक गाणे मिळाले, जे सध्या सर्वांच्या ओठांवर आहे. हेच या अधिवेशनाचे एकमेव फलित मानावे लागेल’ यावरून सरकारने आपल्या प्राथमिक जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी राज्यपालांकडे सरकारविरोधात तक्रार केली. ‘आम्हाला सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही, सरकार आपल्या बहुमताचा माज दाखवत आहे,’ अशी तक्रार त्यांनी केली. विशेष म्हणजे, हे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणावा लागला.

अधिवेशन सरकारच्या वागणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले. आर्थिक धोरणे, सुरक्षाव्यवस्था आणि समाजकल्याण योजनांबद्दल ठोस चर्चा झाली नाही, हेच अधिवेशनाचे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे. त्यामुळे सरकारने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!