महाराष्ट्र

Nagpur : महाराष्ट्र दिनाला काळा दिवस घोषित करत झेंडा फडकवला  

Mukesh Masurkar : राज्याच्या आठ लाख कोटींच्या कर्जात विदर्भ गुदमरतोय   

Author

उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीने काळे झेंडे फडकावत जोरदार आंदोलन केलं.

ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सवात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, त्या दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये मात्र या दिवसाला काळा दिवस म्हणून पाळण्यात आलं. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं. विदर्भासाठी स्वतंत्र राज्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी यावेळी गांधी पुतळ्याजवळ विदर्भाचा झेंडा फडकवला.

काळ्या कपड्यांत, डोक्याला आणि हातांना काळ्या पट्ट्या बांधून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्र दिनाचा निषेध असो, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ अशी नारेबाजी करण्यात आली. झेंडावंदनानंतर आंदोलनकर्ते संविधान चौकाकडे निघाले असताना पोलिसांनी झिरो माईल परिसरातच त्यांना अडवून डिटेन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी

आर्थिक स्थितीवर टीका

आंदोलनाने नागपूर शहरात एक वेगळीच राजकीय खळबळ निर्माण केली आहे. यावेळी ज्येष्ठ विदर्भवादी नेते अहमद कादर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, महिला अध्यक्षा ज्योती खांडेकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत स्वतंत्र विदर्भ ही केवळ मागणी नसून हक्क असल्याचे ठाम मत मांडले. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली.

राज्यावर 8 लाख 14 हजार कोटींचं कर्ज असताना विदर्भाचा बॅकलॉग भरून निघणं अशक्य आहे, असं मत युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी मांडलं. त्यांनी पुढे सांगितलं की, या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. मग विदर्भात विकास अपेक्षित कसा करता येईल? ते म्हणाले की, केंद्र सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करावी. लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे अशा घोषणांनी नागपूरच्या रस्त्यांवर आंदोलन छेडण्यात आले.  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनाला काळा दिवस म्हणून साजरा करत विदर्भाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

BJP : जे फक्त मागणी करत राहिले, त्यांनी आता मौन धरले

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!