महाराष्ट्र

नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा

मुख्यमंत्री होताच South West Nagpur भागाचे भाग्य फळफळले

Author

नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागाच्या विकासासाठी प्रतीक्षेत असलेला मनीषनगर अंडरपास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित झाला. या प्रकल्पाचे काम अनेक महिने रखडले होते, मात्र फडणवीस मुख्यमंत्री होताच या अंडरपासचे काम वेगाने पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात आले.

नागपूर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. 1 लाख 29 हजार 401 पेक्षाही जास्त मतांनी त्यांनी दक्षिण पक्षीच मतदार संघ जिंकलेला होता. खरतर निडणुकीपूर्वी या अंडर पासचे उदघाटन होईल असे म्हटले जात होते, मात्र नंतर असं काय घडलं कि निवडणुकीनंतर या अंडर पासचे लोकार्पण करण्यात आले. यामागे फडणवीस आणि गडकरी यांचा स्वार्थ तर न्हवता? असाही प्रश्न समोर येत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मनीष नगर अंडपासचे काम सुरू होते. अनेक महिने हा रस्ता बंद होता. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती डबलडेकर उड्डाणपूल कमी वेळात पूर्ण करून दाखविला. मनीषनगर नगर फ्लायओव्हरही वेगाने पूर्ण झाला. पण अंडरपासचे काम संथपणे सुरू होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच त्यांच्याच मतदारसंघ दक्षिण पश्चिमचे भाग्य फळफळले. त्यामुळं मनीषनगर अंडरपासचं लोकार्पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय होणार नाही असा राजकीय संकल्प तर करण्यात आला नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अखेर झाले Nagpur मधील ‘त्या‘ प्रकल्पाचे लोकार्पण

बाजारपेठेवर परिणाम

नागपूरमधील विकास प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू होते. यामध्ये मनीषनगर अंडरपास आणि सोमलवाडा रस्ता प्रमुख ठरले होते. मनीषनगर अंडरपासचे काम वेगात सुरू झाले आणि त्याचे लोकार्पणही थाटात पार पडले. परंतु, सोमलवाडा भागातील अंडरपास प्रकल्प मात्र रखडल्याने तेथील नागरिकांना वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोमलवाडा रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता बंद असल्याने त्या भागातील वाहतूक ठप्प झाली होती.

परिणामी स्थानिक बाजारपेठा ठप्प झाल्या. या अडथळ्यामुळे व्यवसायिकांना मोठा फटका बसला. सुरू झालेला विकास थांबल्यामुळे स्थानिकांचे जीवनमानदेखील प्रभावित झाले. शहर बससेवा आणि खाजगी कंपन्यांच्या बसेसनेही मार्ग बदलला. याचा मोठा फटका तरुणाईला बसला. सोमलवाडा रेल्वे क्रॉसिंग भागातील तरुणांना आता मनीषनगरकडे शिफ्ट व्हावे लागले. तिथे नव्याने उभारलेल्या अंडरपासमुळे त्या भागाचा विकास वेगाने झाला. वाहतूक सुलभ झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

राजकीय इच्छाशक्ती

नागपूर हा गडकरी आणि फडणवीस यांचा किल्ला मानला जातो. तरीही त्यांच्या गावातील काही प्रकल्प रखडले का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मुख्यमंत्रीपदाची प्रतीक्षा प्रकल्पाच्या संथगतीसाठी कारणीभूत होती का, असा संशयही व्यक्त होत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच मनीषनगर अंडरपासचे लोकार्पण होणे ही योगायोगाची बाब ठरू शकत नाही.

विदर्भाचा विकास हा गडकरी-फडणवीस यांच्या प्राधान्यक्रमात आहे, असे नेहमी सांगितले जाते. परंतु नागपूरच्या बाहेरील विदर्भातील जिल्ह्यांचा विचार केला तर परिस्थिती वेगळी दिसते. बुलढाणा, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीसारखे जिल्हे अजूनही मूलभूत सुविधा आणि प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूरच्या झिरो माईल परिसरात विकासाचा झपाटा दिसत असताना विदर्भाच्या इतर भागांची उपेक्षा का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!