प्रशासन

Nagpur Airport : आभाळात उडण्याआधी जमिनीवरच जलप्रवासाचा अनुभव

Ashish Deshmukh : नागपूर विमानतळाच्या हलगर्जीपणाला आमदारही हैराण

Author

सध्या इंडिगो एअरलाईन्सचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नागपूर विमानतळावर जोरदार पावसात इंडिगोच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी आहोत’, ‘सुरक्षा हीच आमची जबाबदारी’ एअरलाईन्सच्या जाहिरातींमध्ये असलेले हे दावे फक्त कागदावरच शोभून दिसतात का, असा सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत. कारण प्रत्यक्षात सेवा म्हणजे केवळ तडजोडींचा खेळ आहे, हे पुन्हा एकदा नागपूर विमानतळावर सिद्ध झाले. अहमदाबादच्या विमान अपघाताचे व्रण अजून ताजे असतानाच, इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ सेवेमुळे नागपूरच्या प्रवाशांचा संयम सुटला. 25 जून रोजी मुंबईहून नागपूरला आलेल्या फ्लाइट 6E 5147 प्रवाशांना पावसात भिजण्याचा अक्षरशः प्रसाद मिळाला. त्या दिवशी नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता.

अशा हवामानात सामान्य अपेक्षा असते की विमानतळ प्रशासन आणि एअरलाईन्स एअरोब्रिजची सुविधा देतील. पण येथे उलट चित्र पाहायला मिळाले. प्रवाशांना थेट बसमध्ये कोंबण्यात आले आणि त्या बसने टर्मिनलकडे पाठवले. मात्र, खरी गंमत म्हणजे, त्या बसच्या छतामधूनच पाणी गळत होते. म्हणजे वरून पाऊस आणि आतूनही पाऊस. प्रवाशांना वाटले असावे विमान प्रवास केला की होडी प्रवास? या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रवाशांनी एअरलाईन्स आणि नागपूर विमानतळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Parinay Fuke : गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांना नोकरीचा मार्ग मोकळा

सेवा सुधारण्याची मागणी

जोरदार पावसातसुद्धा एअरोब्रिज का वापरला नाही?, असा सवाल अनेक प्रवाशांनी केला. विशेष म्हणजे, त्या फ्लाइटमध्ये महाराष्ट्र सरकारचे मंत्री आशिष जयस्वाल आणि सावनेरचे आमदार आशिष देशमुख हे देखील प्रवास करत होते. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. हे प्रथमच घडलेले नाही. इंडिगोच्या प्रवाशांनी वारंवार खराब सुविधा, ढिसाळ नियोजन आणि बेफिकीरपणाचा अनुभव घेतला आहे. तिकिटांचे दर वाढले तरी सुविधा मात्र ‘डाऊनग्रेड’च होत आहेत. प्रवाशांनी यानंतर जोरदार आवाज उठवत एअरलाईन्सकडून सेवा सुधारण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी घडलेला अहमदाबाद विमान अपघात अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे.

लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट टेकऑफ करताना काही सेकंदांत अपघातग्रस्त झाली आणि पाहता पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 प्रवासी आणि जमिनीवर उपस्थित 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. एकूण मृतांची संख्या 295 वर पोहोचली. अपघाताचे कारण शोधण्याचे काम अजून सुरूच आहे. पण प्रश्न आहे या अपघातातून काही शिकले तरी का? की पुन्हा पुन्हा केवळ ‘दुर्दैवी अपघात’ म्हणत हात झटकले जातील? जगभर एअरलाईन्स आपली प्रतिमा ‘सुरक्षित आणि सोयीस्कर’ म्हणून रंगवत असल्या तरी, जमिनीवरची स्थिती वेगळी आहे. नागपूर विमानतळावरील ही घटना केवळ एक त्रुटी नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशाराच आहे. प्रश्न एवढाच या त्रुटीवर फक्त माफी मागून टाकली जाईल का, की खरंच काही सुधारणा होईल?

Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!