
महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा केला. दुपारी साडेतीनपर्यंत त्यांचा दौरा पार पडला. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले, ‘हे नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलमय आणि समृद्ध होवो.’ दुपारी दोन वाजता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या बँकेच्या आर्थिक अडचणींवर मार्ग काढण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला. फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, ‘ही बँक काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे अडचणीत सापडली होती. मात्र, आता आम्ही तिच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस पावलं उचलत आहोत.’ राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

फडणवीसांचा संकल्प
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या नागपूर जिल्हा बँकेचा टर्नअराउंड करण्याचा सरकारचा संकल्प आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. आता पुढील तीन वर्षांत राज्य सहकारी बँक या बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करेल, असं फडणवीसांनीं स्पष्ट केले आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने एक समृद्ध महाराष्ट्राचा घडविण्याचा संकल्प या ठिकाणी मी व्यक्त करतो असे फडणवीसांनी सांगितले. नागपूरची ही बँक पुन्हा सुरु करण्याच्या विचारत आम्ही आहोत. असेही ते म्हणाले.
बीडमध्ये झालेल्या मशिदीत स्फोटबाबत देवेंद्र फडणवीस म्हणले की त्यांना माहिती मिळाली आहे. त्यांनी सांगितलं की, या घटनेबाबत सर्व तपशील लवकरच पोलिस अधीक्षक (SP) माध्यमांसमोर सादर करतील. त्यामुळे या प्रकरणावर अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत रविवारी पहाटे तीनच्या सुमारास स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मशिदीचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे मशिदीच्या जमिनीवर मोठा खड्डा पडला आहे.
Chandrashekhar Bawankule : पक्षप्रवेशासाठी बैकग्राउंड व्हेरिफाय अनिवार्य
मोदींचा दौरा
मोदींच्या नागपूर दौऱ्यावर बोलतांना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी स्वतः स्वयंसेवक आहेत. ते पूर्वी संघाचे प्रचारक राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात संघाबद्दल नेहमीच विशेष स्थान आहे. आजच्या कार्यक्रमातही त्यांनी हे स्पष्टपणे व्यक्त केले, आणि एक स्वयंसेवक म्हणून आम्हालाही याचा आनंद आहे. त्यांची संपूर्ण जीवनशैली अजूनही प्रचारकासारखीच आहे. त्यामुळे जेव्हा ते कार्यक्रमात आले, तेव्हा त्यांच्या भाषणातून त्यांचा अनुभव आणि त्याची अनुभूती स्पष्टपणे जाणवली. आम्हीही त्या क्षणाचे साक्षीदार होतो.