महाराष्ट्र

Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद

Vikram Misri : ऑपरेशन सिंदूरची यशस्वी अंमलबजावणी

Author

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. आकाशातून मिळालेल्या हे उत्तर पाकिस्तानला थरकाप सोडणारा आहे.

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट शब्दांत सूड घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही, अशा थेट शब्दांत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करी दलांचे प्रमुखांसोबत तब्बल तीन वेळा उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. यामध्ये त्यांनी लष्कराला फ्री हँड दिला होता. हे सगळं पाहता, देशात युद्धसदृश वातावरण निर्माण झालं होत. या पार्श्ववभूमीवर आता भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताकडून आधीच दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाईचे संकेत मिळत होते. अखेर 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं याची अंमलबजावणी करण्यात आली. हे केवळ सीमेपलीकडील दहशतवाद्यांना उत्तर नव्हे, तर देशाच्या सुरक्षेसाठी एक निर्णायक टप्पा ठरला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या घटनेबाबत सडेतोड भूमिका घेत, ती एक अमानवी आणि बर्बर कृती असल्याचे ठामपणे स्पष्ट केले आहे. त्यांनी हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावरच घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करत, यामागील हेतूवर प्रकाश टाकला.

Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे

पहलगाम हल्ल्याचा बदला

ऑपरेशन सिंदूर मोहीम राबविल्यानंतर काही तासांत भारतीय लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात आली. दहशतीचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत थेट दहशतवाद्यांच्या केंद्रांवर जोरदार एअर स्ट्राईक करून सर्वांचा जबाब दिला. विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनबाबत सविस्तर माहिती देताना, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान आजही दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे.

पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर TRF (द रेसिस्टन्स फ्रंट) या दहशतवादी संघटनेबाबतचा मुद्दा भारताने थेट संयुक्त राष्ट्रसंघात मांडला. लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी केलेल्या या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक आणि 1 नेपाळी नागरिक ठार झाले होते. यामध्ये दहशतवाद्यांनी थेट कुटुंबाच्या समोरच नागरिकांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. भारतीय हवाई दलाने यावेळी एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये 4 पाकिस्तानातील तर 5 पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचा समावेश होता.

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा

पंतप्रधान निवासात बैठक

गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीवरून आरोग्य केंद्रे, धार्मिक स्थळे यांच्यामागे लपवले गेलेले जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. हे सर्व संघटनांचे ठिकाणे जागतिक स्तरावर बंदी असलेल्या दहशतवाद्यांचे गढ मानले जात होते. कारवाईदरम्यान देशातील राजकीय आणि सुरक्षा व्यवस्थेत समन्वयाचे उदाहरण पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. त्याचवेळी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल तसेच बीएसएफ महासंचालक यांच्याशी सतत संपर्क साधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

सीमावर्ती भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी त्वरित उपाययोजना राबविण्याचे आदेशही दिले. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका अधिक ठाम झाली आहे. दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भारताने दाखवलेली ही तत्परता आणि निर्णायक कारवाई म्हणजे केवळ एक लष्करी ऑपरेशन नव्हे, तर देशाच्या प्रतिष्ठेचा आणि सार्वभौमत्वाचा भक्कम प्रत्युत्तर आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!