पूर्व विदर्भातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना भेटून बैलांचे महत्त्व सांगितले.
शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप. घेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. बैलपोळा सणाच्या दिवशी इंद्रजीत भालेराव यांची ही कविता फुलत्या मातीवर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रतिबिंब ठरते. महाराष्ट्रभरात हसतमुखाने साजरा होणाऱ्या या सणामध्ये फक्त बैलांचा सन्मान नाही, तर शेतकरी आणि त्यांच्या जीवाभावाच्या साथीदारांमधील अटूट नाताही जिवंत होत असते. पण गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मनात चिंता भरली आहे. कर्जमाफी अद्यापही मिळालेली नाही. यामुळे अनेक शेतकरी मानसिक ताणाखाली आले आहेत, तर काहींना आपले जीवनसाथीही विसरावे लागत आहे.
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या या व्यथेला मान्यता देत भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान फक्त जनावरांचे नाही, तर ते शेतीचे खरे साथीदार आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत, प्रत्येक श्रमामध्ये बैलांचा हात असतो. म्हणूनच त्यांचा सन्मान करणे फक्त परंपरेनुसार नाही, तर जीवनावश्यक आहे. त्यांच्या निवासस्थानी डॉ. परिणय फुके यांच्या मार्गदर्शनाखाली बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलजोडीची पूजा करून त्यांना हार, नैवेद्य अर्पण करण्यात आले. बैलांशिवाय शेती अपूर्ण आहे.
Nagpur : राहुल गांधींवर भाजपचे वार, जिल्हा काँग्रेसची तोफ सज्ज
उत्सवात भावनांचा संगम
शेतकरी आपल्या बैलजोडीला देवतासमान मानतो, असे डॉ. फुके यांनी सांगितले. त्यांच्या शब्दांमध्ये शेतकऱ्यांच्या भावनांचा गाभा होता. सण हा फक्त उत्सव नाही, तर कष्टकरी शेतकऱ्याचा आपल्या साथीदाराला दिलेला सन्मान आहे. यंदाचा बैलपोळा मात्र शेतकऱ्यांसाठी वेगळाच ठरला. कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी चिंता आणि दुःखाने ग्रस्त होते. अशा परिस्थितीत काही शेतकरी बैलाची जोडी घेऊन थेट डॉ. परिणय फुके यांच्या दाराशी आले आणि आपल्या समस्यांवर मार्गदर्शन मागितले. डॉ. फुके यांनी भावनिकपणे शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, यावेळी कर्जमाफी निश्चितच होणार आहे. आपली व्यथा लक्षात घेतली जात आहे.
शासनासमोर हा प्रश्न उभा राहील. डॉ. फुके यांचा शेतकऱ्यांसाठी नेहमीच असलेला संवेदनशील दृष्टिकोन आणि समस्यांवर थेट तोडगा शोधण्याची वृत्ती यामुळे पूर्व विदर्भातील शेतकरी त्यांना अत्यंत विश्वासाने पाहतात. बैलपोळा हा सण आता केवळ पारंपरिक उत्सव नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा प्रसंगही ठरला. शेतकरी, बैल, आणि आपल्या जीवनातील संघर्ष यांचा संगम दिसतो अशा या बैलपोळा उत्सवात, डॉ. परिणय फुके यांनी दिलेले आश्वासन ही शेतकऱ्यांच्या हृदयात नवे आत्मविश्वास निर्माण करते. या सणात भावनांचा आणि आशेचा सुंदर संगम पाहायला मिळाला, ज्यात प्रत्येक बैलजोडीच्या मागे शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचा आदर आणि समाजातील एक शक्तिशाली संदेश दडलेला आहे.
MoRTH Rules : गाडी जुनी झाली तर फी नवी झाली, सरकारचा भन्नाट फंडा
